शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
3
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
4
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
5
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
6
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
7
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
8
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
9
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
10
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
11
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
12
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
13
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
15
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
16
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
17
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
18
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
19
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
20
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा

सगळ्यांना फुलण्याची संधी मिळणे आवश्यक

By admin | Published: March 20, 2016 12:34 AM

उस्मानाबाद : तथागत बुध्द आणि संत तुकाराम यांनी सर्वसामान्यांच्या सुखाचा विचार केला. सगळ्यांना त्यांच्या आयुष्यात फुलण्याची संधी मिळाली पाहिजे,

उस्मानाबाद : तथागत बुध्द आणि संत तुकाराम यांनी सर्वसामान्यांच्या सुखाचा विचार केला. सगळ्यांना त्यांच्या आयुष्यात फुलण्याची संधी मिळाली पाहिजे, असा विचार त्यांनी दिला. हा विचार आत्मसात करण्याची गरज डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केली. वर्ण व जातीव्यवस्थेतून आलेल्या दुभंगलेपणामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. जाती-धर्माचा दुराभिमान टाळला तरच भारताला भवितव्य असल्याचा इशाराही डॉ. साळुंखे यांनी यावेळी दिला. येथील व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने शहर पोलिस ठाण्यासमोरील उस्मानाबाद क्लबच्या मैदानावर आयोजित ‘तथागत बुध्द आणि संत तुकाराम’ या विषयावर त्यांनी सलग दुसऱ्या दिवशीही मांडणी केली. बुध्दाने कुठेही व्यक्तीवाद मांडलेला नाही. मी व्यक्ती म्हणून महत्त्वाचा नाही तर विचार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे विचारांचे आचरण करा, असे ते वारंवार सांगत होते. मी सांगितले ते जसेच्या तसे स्वीकारा, असेही माझे म्हणणे नाही. तर, मी दिलेला विचार सुध्दा तपासून घ्या. तो पटल्यानंतरच त्याची अंमलबजावणी करा. बुध्दांच्या या तत्त्वावरून ते किती लोकशाहीवादी होते, याचा प्रत्यय येतो, असे ते म्हणाले. बुध्द आणि संत तुकारामांनी स्वत:च्या संसाराकडे दुर्लक्ष करून समाजाचा, जगाचा संसार केला. दु:ख आहे, त्याला कारण आहे. दु:खाला दूर करण्यासाठी उपाय आहे. हा आष्टांग मार्ग त्यांनी सांगितला. बुध्दांनी सांगितलेल्या चार संपदा सर्वांनी अंगिकारल्यास व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असेही डॉ. साळुंखे यावेळी म्हणाले. बुध्दानी संसाराचा द्वेश सांगितला नाही, तर ते उभं रहा, प्रयत्न करा असे म्हणाले. संपत्तीची काळजी घेण्यास त्यांनी सांगितले. याबरोबरच नेहमी कल्याणाची इच्छा असणारे मित्र सोबत असू द्या आणि संसार करताना उत्पन्न आणि खर्च याचा मेळ हवा. या चार संपदांचे पालन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बुध्दाच्या अहिंसेच्या तत्त्वामुळे इतिहासात भारताचा पराभव झाल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यात तथ्य नाही. बुध्दांचाच विचार पुढे घेऊन गेलेले सम्राट अशोक यांचे अफगाणीस्तानापासून भारतातील दक्षिण सिमेपर्यंत साम्राज्य होते. कारण, सर्वांना फुलण्याची समान संधी त्या काळात बुध्द विचाराने दिली होती. मात्र, नंतरच्या काळात वर्ण, जातीचा दुराभिमान वाढल्याने भारतीय समाज दुभंगला गेला. भारतीयांच्या पराभवाचं हे महत्त्वाचं कारण होतं. आजची परिस्थिती पाहताना बुध्दांचा तो विचार पुन्हा अंगिकारण्याची वेळ आली आहे. बुध्दाप्रमाणेच संत तुकारामांनीही आपल्या अभंगाच्या माध्यमातून वर्णाचा अभिमान कसला बाळगता, असा सवाल केला होता. प्रयत्नवाद बाळगण्यास तथागत बुध्दासह तुकारामांनीही सांगितले. सबबी सांगू नका, नुसते बोलू नका तर आचरणावर भर द्या, असेच या दोन्ही महापुरुषांचे म्हणणे होते. वर्ण व जातीव्यवस्थेवर या दोन्ही महापुरूषांनी प्रहार केला. जन्म कुठे झाला, हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही कर्म काय करता, यावर तुमचे भवितव्य अवलंबून असल्याचे वारंवार सांगणाऱ्या या महापुरूषांच्या विचारांचे अनुकरण करण्याची आज गरज आहे, असेही डॉ. साळुंखे यावेळी म्हणाले. कार्यक्रमास शहरासह परिसरातील विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)