शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
4
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
5
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
6
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
8
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
9
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
10
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
11
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
12
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
13
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
14
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
15
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
16
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
17
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
18
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
19
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
20
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन

औट्रम घाटातील बोगद्याला स्थानिक पातळीवरूनच खोडा; आठ हजार कोटींवर गेला खर्च 

By विकास राऊत | Published: February 29, 2024 7:52 PM

आता पर्यायी मार्गाचा विचार सुरू

छत्रपती संभाजीनगर : कन्नडमार्गे चाळीसगावकडे जाणाऱ्या तिकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २११ वर असलेल्या औट्रम घाटातील ११ किलोमीटर अंतरात वाहतूक खोळंबत असल्याने तो सात महिन्यांपासून बंद असून, याचा थेट परिणाम जिल्ह्यासह इतर भागांतील अर्थकारणावर झाला आहे. बोगद्याला वनविभागाकडून एनओसी न मिळण्यासह स्थानिक पातळीवरूच या कामात वारंवार खोडा आणला गेल्याची चर्चा आहे. ८ हजार कोटी रुपयांच्या आसपास बोगदा बांधणीचा खर्च केला आहे. एनएचएचआयने ते काम रद्द करून घाटाला पर्यायी मार्गही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यालाही अद्याप मुहूर्त लागलेला नाही.

तलवाडा घाटातील मार्गाची दुरुस्ती करायची असल्याने सुमारे ४ हजारांहून अधिक जड वाहने (ज्यामध्ये उद्योगांचा कच्चा-पक्का माल, जीवनावश्यक वस्तू असतात) लांबून वळसा घालून शहरात येत आहेत. धुळेमार्गे पुढे गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरयाणा या राज्यांची कनेक्टिव्हिटी मिळणारे मार्ग आहेत. तर, घाटातून मराठवाड्यासह, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिणेत व्यापारी बाजारपेठांकडे जाण्याचे मार्ग आहेत. आता घाट बंद असल्यामुळे लांबवरून वाहतूक वळली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्याऐवजी नाशिक अथवा अहमदनगरच्या दिशेने अर्थकारणाशी निगडित वाहतूक जात असल्याचे दिसते.

आर्थिक उलाढाल ठप्प....ऑगस्ट २०२३ पासून घाट जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद आहे. यामुळे मार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल, गॅरेजच्या व्यवसायावर गदा आली आहे. घाटाच्या पलीकडून येणारा भाजीपाला कन्नड व छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येणे बंद झाले. परिणामी, शेतकऱ्यांचे अर्थकारणही कोलमडले.

प्रस्ताव पाठवा, तातडीने मंजुरी देऊकेंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना २६ फेब्रुवारी रोजी विचारले असता ते म्हणाले, वनविभागाने एनओसी दिली नाही. त्यामुळे घाट चौपदरीकरणाचा पर्याय शोधला. त्यालाही वनविभागाकडून प्रतिसाद मिळाला नाही. पर्यायी मार्गाचा प्रस्ताव मुख्यालयाला पाठविला तर तातडीने मंजुरी देता येईल. घाटाला पर्याय काय असू शकेल, यावर स्थानिक पातळीवर विचार करावा.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग