शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

‘नवीन संहितांवर प्रयोग करावेत’

By admin | Published: November 16, 2014 12:01 AM

औरंगाबाद : कलाकारांच्या सादरीकरणात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आमूलाग्र असे बदल होत चालले आहेत. यामुळे नवीन कलाकारांच्या कलागुणांसोबतच नवीन लेखकांच्या लेखनालाही वाव मिळतो

औरंगाबाद : कलाकारांच्या सादरीकरणात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आमूलाग्र असे बदल होत चालले आहेत. यामुळे नवीन कलाकारांच्या कलागुणांसोबतच नवीन लेखकांच्या लेखनालाही वाव मिळतो. या नवोदित कलाकारांच्या मेहनतीला राज्य नाट्यस्पर्धेसारख्या व्यासपीठावर नवीन संहितांचा प्रयोग करावा, असे प्रतिपादन प्रा. डॉ. दिलीप घारे यांनी राज्य नाट्यस्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात केले.तापडिया नाट्यमंदिरात आयोजित हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धेच्या प्रथम फेरीचा शुभारंभ सोहळा पार पडला. या नाट्यस्पर्धेची सुरुवात किरण लद्देलिखित ‘अघटित’ या दोन अंकी नाटकाने झाली. यावेळी उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. दिलीप घारे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक श्रीकांत पाठक, भारत जगताप, गजानन कराड आदींची उपस्थिती होती.नवोदित लेखकांनी आपल्या समस्या, आपले प्रश्न लिखाणात आणावेत, त्याचे नाटकात रूपांतर करावे, असे केल्यास रसिकांचा प्रतिसाद वाढणार हे नक्की. या पद्धतीने नाटके सादर करीत गेल्यास या स्पर्धेची भूमी हीच खरी रंगभूमी आहे, असे मानले जाईल, असा विश्वासही डॉ. घारे यांनी यावेळी व्यक्त केला.महत्त्वाकांक्षी कलाकारांनी या स्पर्धेत उतरल्यास तसेच मार्गदर्शनयुक्त नाटकाचे प्रयोग सादर केल्यास हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धा ही कलाकारांसाठी मोलाची व मानबिंदू ठरेल. तसेच नवोदित नाट्यलेखकांनी आपल्या लिखाणात सामाजिक पर्यावरण, सामाजिक परिस्थिती, मानसिकता यासारख्या विषयांचा समावेश केल्यास सादरीकरणात निश्चितच बदल घडून येईल व रसिकांचा नाटकाकडे असलेला ओढा वाढेल, असे मत अध्यक्षीय समारोपात बोलताना प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी व्यक्त केले.