शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

काॅंग्रेसमध्ये उत्साही वातावरण, तिकिटासाठी इच्छुकांची गर्दी; वाजतगाजत केले शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 8:03 PM

अतिआत्मविश्वास नडेल, एकजुटीने व कठोर परिश्रम करून विजय मिळवून देण्याचे नाना पटोले यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर काॅंग्रेसमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. पक्षातर्फे सोमवारी घेण्यात आलेल्या छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत अनेक इच्छुक उमेदवार वाजतगाजत आले व शक्तिप्रदर्शन करून गेले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत असताना एक इच्छुक उमेदवार वाजतगाजत येत होता. ते वाजवणं थांबवा, असे सुचवूनही ते थांबलं नाही. तेव्हा, ‘वाद्य वाजवणं थांबलं नाही तर मी संबंधित उमेदवाराचे तिकीटच कापेन,’ असा दम दिल्यानंतर वाद्य वाजवणं थांबलं आणि नाना पटोले यांना पुढील भाषण करता आलं.

सकाळी पत्रकार परिषदेनंतर जिमखाना क्लबमध्येच आढावा बैठकीसाठी पावसाची काळजी घेत भव्य शामियाना उभारण्यात आला होता. हा शामियाना ओसंडून वाहत होता. कार्यकर्त्यांना खाली बसून भाषण ऐकावे लागले. एकट्या नांदेड जिल्ह्यातून एक हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले असल्याची माहिती पटोले यांनी दिली. याचवेळी नवनिर्वाचित खासदार डॉ. कल्याण काळे व लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांचा सत्कार करण्यात आला. प्रकृती बरी नसल्यामुळे नांदेडचे खासदार वसंत चव्हाण उपस्थित राहू शकले नाहीत.

महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, बंटी पाटील, आरेफ नसीम खान व अमित देशमुख आदींची भाषणे झाली. खा. डॉ. कल्याण काळे यांनी प्रास्ताविक केले. शक्तिप्रदर्शनाला डॉ. जितेंद्र देहाडे यांच्यापासून सुरूवात झाली. कन्नडचे इच्छुक उमेदवार नामदेव पवार हेही समर्थकांसह आले. जालन्याचे आमदार कैलाश गोरंट्याल हे मंचावर उपस्थित होते. पण त्यांचे समर्थक घोषणा देत आले. सुरेश जेथलिया, मंठ्याचे कल्याण बोराडे आदींनीही समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले.

आढावा बैठकीच्या आधी रमेश चेन्नीथला व नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सरकार विधानसभेची निवडणूक एक महिना पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली. सरकारची लाडकी बहीण योजना ही लाडकी खुर्ची असल्याची व हे सरकार शेतकरी, शेतमजूर, युवक व महिला विरोधी असल्याची टीका केली. लाडक्या बहिणींची एवढी काळजी होती तर मग ही योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर का आणली? अजित पवार म्हणतात, तुम्ही जर महायुतीचं बटण नाही दाबलं तर योजना बंद होईल, असा इशारा देतात. यातच या योजनेचा उद्देश दडलेला नाही का? असे सवाल पटोले यांनी उपस्थित केला. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारचे वर्णन लुटारू, डाकू सरकार असे करत राज ठाकरे हे कन्फ्यूज्ड नेते असल्याची टीका केली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेस