शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

दोन परीक्षांमध्ये अपयश अन् नंतर सलग ३ परीक्षांमध्ये यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 13:06 IST

जानेफळच्या शारदाची स्पर्धा परीक्षेत गगन भरारी

- विजय जाधव

शिऊर : केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये अपयश आल्यानंतर खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवून सलग ३ परीक्षांमध्ये यश संपादन करण्याची किमया वैजापूर तालुक्यातील जानेफळ येथील शारदा कैलास त्रिभुवन या तरुणीने साधली आहे.

जानेफळ येथील शेतवस्तीवर राहणाऱ्या शारदा कैलास त्रिभुवन या तरुणीचे शालेय शिक्षण गावातच झाले. ११ वी आणि १२ वीचे शिक्षण वैजापूर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात झाले. यासाठी ती शेतवस्तीपासून दररोज ३ किमी पायी चालत वैजापूरसाठी एसटी बस पकडत असत. १२ वी विज्ञान शाखेत चांगले गुण मिळाल्याने शारदाला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात बीएस्सी ॲग्री प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळाला. तेथेच शारदाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परिक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चांगल्या गुणाने बीएस्सी ॲग्रीची पदवी मिळाल्यानंतर यूपीएससी आणि एमपीएससीची परीक्षा दिली; परंतु त्यात यश मिळाले नाही. त्यानंतरही खचून न जाता बॅंकिंग व अन्य स्पर्धा परीक्षेची घरातूनच तयारी सुरू ठेवली. बॅंकिंगच्या परीक्षेत दोन वेळा मुलाखतीपर्यंत जाऊन यश मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा जोमाने तयारी चालू ठेवली. अशात घरातील मंडळींनी तिच्यासाठी स्थळ सुचवायला सुरुवात केली. घरच्यांच्या मनाप्रमाणे स्थळ आले आणि त्यांनी शारदाचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. शारदानेही त्यास होकार दिला.

हळदीला पहिलाच निकाल, आनंदात भर...शारदाचे लग्न जमल्यानंतर हळदीच्या दिवशी २२ जानेवारी २०२४ रोजी तिचा तलाठी भरती परीक्षेचा पहिला निकाल जाहीर झाला. त्यात ती जिल्ह्यातून मुलींमध्ये प्रथम आली. त्यामुळे घरच्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्यानंतर १६ मार्च रोजी कृषी सहायकपदी तिची निवड झाल्याची बातमी आली. त्यानंतर १ एप्रिल रोजी बॅंकिंगच्या आयबीपीएस परीक्षेतची ती उत्तीर्ण झाल्याचा निकाल आला. त्यामुळे शारदाची सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कृषी क्षेत्र अधिकारीपदी निवड झाली. लागोपाठ तीन परीक्षांमध्ये शारदाने यश संपादन केल्याने कुटुंबीय, नातेवाईकांनी शारदाचे काैतुक केले. शिवाय गावातही शारदाच्या यशाचीच चर्चा सुरू झाली.

बालपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्नयाबाबत बोलताना शारदा म्हणाली, आईवडील, आजी-आजोबा यांच्या कष्टाची जाणीव होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा मन लावून अभ्यास केला. अभ्यासात सातत्य ठेवले. बालपणापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यामुळे अपयश आल्याने खचून न जाता परीक्षेची तयारी चालू ठेवली. त्यानंतर सलग तीन परीक्षांमध्ये यश मिळाले, याचे समाधान वाटते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMPSC examएमपीएससी परीक्षा