शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

शेतकरी केशर आंब्यातून मालामाल; छत्रपती संभाजीनगरातून तीन देशांत १२५ टन आंब्याची निर्यात

By बापू सोळुंके | Updated: August 23, 2024 13:54 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे ४०० एकर क्षेत्रांवर केशर आंब्याची लागवड करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : आपल्या जिल्ह्यातील शेतकरी पिकवित असलेला केशर आंबा अमेरिका, जपान आणि इंग्लंड या देशवासीयांच्या पसंतीला उतरला आहे. केशर आंबा निर्यातीतून जिल्ह्यातील शेतकरी मालामाल होत आहे. यासोबतच जिल्ह्यातील मोसंबी बांगलादेशाला, तर डाळिंब अबुधाबी, दुबईला निर्यात होते.

आंब्याची निर्यात सुमारे १२५ टनांवरछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे ४०० एकर क्षेत्रांवर केशर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. यासोबतच शेतकरी आता अतिघन पद्धतीने केशर आंब्याची लागवड करीत आहे. यावर्षी जिल्ह्यातून सुमारे १२५ टन केशर आंब्याची युराेपात निर्यात झाली होती.

जिल्ह्यात आंब्याचे ३३३७ हेक्टर क्षेत्रछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आंब्याचे ३३३७ हेक्टरवर पारंपरिक गावरान आंब्याचे क्षेत्र आहे. यात केवळ ४०० एकर क्षेत्र हे केशर आंब्याचे असल्याची माहिती आहे. केशर आंब्याची लागवड दरवर्षी वाढत आहे. केशर आंब्यातून मिळणारे उत्पादन अन्य पिकांच्या तुलनेत अधिक असल्याने शेतकरी केशर आंब्याच्या शेतीकडे वळत असल्याचे दिसून येते.

तालुका --------------             क्षेत्र (हेक्टरमध्ये)छत्रपती संभाजीनगर- ५५८पैठण--- ५२०फुलंब्री- ५७२वैजापूर- ४८५गंगापूर-२४०खुलताबाद-३१३सिल्लोड-२३९सोयगाव-३३कन्नड--३७२

तीन देशांत केली जाते निर्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जपान, इंग्लंड आणि अमेरिका या तीन देशांना केशर आंब्याची निर्यात होते. पूर्वी जहाजामार्गे होणारी निर्यात आता विमानाने होत असल्याने आंबा लवकर बाजारपेठेत पोहोचतो.

आंब्याची शेती लाभदायककेशर आंब्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांनी यावर्षी एकरी साडेसात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे. केशर आंब्याला युरोपियन बाजारपेठेत चांगली मागणी असते. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केशर आंबा शेतीकडे वळावे. अतिघन लागवडीतून लवकर उत्पादन मिळते. अन्य कोणत्याही शेतीपेक्षा केशर आंब्याची शेती लाभदायक आहे.- डाॅ. भगवानराव कापसे, कृषी अभ्यासक.

निर्यात करण्याऐवजी येथेच विक्रीपूर्वी आम्ही केशर आंबा निर्यात करीत होतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून निर्यातीपेक्षा अधिक दर आपल्या बाजारात मिळतो. यामुळे आम्ही निर्यात करण्याऐवजी येथेच पॅकिंग करून आंबा विक्री करतो. केशर आंब्याची शेती किफायतशीर आहे. शेतकऱ्यांनी घनदाट पद्धतीने केशर आंब्याची लागवड करावी. --सुशील बलदवा, माजी अध्यक्ष केशर आंबा उत्पादक संघ.

कृषीमालाची निर्यात वाढावीछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून केशर आंब्याची युरोपियन देशांना निर्यात होते. शिवाय डाळिंबाची दुबई आणि अबुधाबीला निर्यात होते. जिल्ह्यातील कृषीमालाची निर्यात वाढावी, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत आहोत.- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक.

टॅग्स :MangoआंबाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र