शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

शेतकऱ्यांनो, उसाचे पाचट, गव्हाचे धसकट जाळू नका; शेतातच सडू द्या, जमिनीचा पोत सुधारतो

By बापू सोळुंके | Published: December 22, 2023 12:05 PM

लवकरात लवकर जमिनीत कुजावे यासाठी त्यावर बाजारात मिळणाऱ्या औषधाची फवारणी करावी.

छत्रपती संभाजीनगर : उसाचे, गव्हाचे पीक घेतल्यानंतर पाचट-धसकट शेतकरी जाळून टाकतात. याचा जमिनीला आणि वातावरणाला तोटाच होतो. शेतीतज्ज्ञाच्या मते, गव्हाचे धसकट असो किंवा उसाचे पाचट जमिनीतच सडू दिले तर शेतजमिनीतीला सेंद्रिय कर्ब सुधारतो. परिणामी पिकाला पोषक तत्त्व मिळतात आणि उत्पादन वाढते.

उसाचे पाचट जाळू नका दरवर्षी शेतकरी उसाची तोडणी झाल्यानंतर उसाचे पाचट जाळून टाकतात. उसाचे पाचट जाळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड मेहनत करावी लागते. मात्र, कृषीतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार उसाचे पाचट हे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी एक उत्तम असा सेंद्रिय पदार्थ आहे. हे पाचट शेतातच सडू द्यायला हवे.

मका, गव्हाच्या काड्या, धसकट जाळू नकागहू पिकाची कापणी झाल्यानंतर अथवा हार्वेस्टरने गव्हाची काढणी केल्यावर शेतात गव्हाच्या काड्या आणि धसकट उभे असते. खरीप हंगामासाठी शेत तयार करण्यासाठी शेतकरी सर्वप्रथम गव्हाच्या काड्या आणि धसकट जाळून टाकतात. मात्र, या काड्या आणि धसकट जाळून न टाकता. शेतकऱ्यांनी त्यावर नांगरणी करावी. जेणे करून हे धसकट जमिनीत सडून त्याचे खत होईल. हे खत पुढील पिकासाठी उत्तम असे टॉनिक असते.

प्रदूषण वाढले, जमिनीसाठीही धोकादायकदरवर्षी शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामपूर्वी शेतीतील गहू, मका, ज्वारी, बाजरीच्या पिकाचे धसकट, काडी, कचरा,उसाचे पाचट, कापसाच्या पराट्या जाळून टाकतात. यामुळे हवेतील प्रदूषणाचा स्तर वाढतो. वाढलेले प्रदूषण मानवासाठी आणि जमिनीसाठी धोकादायक ठरते, म्हणून शेतातील पिकांचा कचरा जाळू नका, असे आवाहन अभ्यासक करतात.

जमिनीत गाडणे लाभदायक गहू, मका, ज्वारी, बाजरी पिकाची काढणी झाल्यानंतर उरलेले धसकट, काडी, कचरा, उसाचे पाचट, कापसाच्या पराट्या न जाळता त्यावर रोटाव्हेटर फिरवून अथवा नांगर फिरवून जमिनीत गाडावे. लवकरात लवकर हे जमिनीत कुजावे यासाठी त्यावर बाजारात मिळणाऱ्या औषधाची फवारणी करावी. असे केल्यास जमिनीचा पोत सुधारतो.-सुरेश बेडवाल, विना मशागत शेतीचे पुरस्कर्ते.

जमिनीची सुपिकता वाढतेशेतातील कोणत्याही पिकाचा पाला, पाचोळा अथवा गव्हाच्या काड्या, उसाचे पाचट शेतात सडू दिल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो. परिणामी जमिनीची सुपीकता चांगली होते आणि पुढील पिकाचे उत्पादन वाढते. उसाचे पाचट असो किंवा अन्य पिकाचा काडी, कचरा जाळल्यास हवेतील प्रदूषणच वाढते.-प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक

 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद