शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

जाचक जाचक अटींमुळे शेतकऱ्यांचा आखडता हात

By admin | Published: September 14, 2015 11:23 PM

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई तांत्रिक अडचणीत अंबाजोगाई तालुक्यात ४३८ विहिरींचे काम रखडले आहे तर शेततळ्याचे २६ प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र त्यातील तेराच शेततळ्यांना मंजुरी मिळाली आहे.

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईतांत्रिक अडचणीत अंबाजोगाई तालुक्यात ४३८ विहिरींचे काम रखडले आहे तर शेततळ्याचे २६ प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र त्यातील तेराच शेततळ्यांना मंजुरी मिळाली आहे.दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी शासनाच्या पंचायत समिती व कृषि विभागाच्या माध्यमातून एम.आर.ई.जी.एस. यांच्या वतीने शेततळी व विहिरींना अनुदान देऊन जमीन ओलिताखाली आणण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतु रोहयोच्या माध्यमातून कामे करतांना जॉबकार्ड व इतर जाचक अटींमुळे मंजुरी मिळूनही कामे केली जात नाहीत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी व शेतमजुरांना त्या-त्या गावांमध्ये रोजगाराची उपलब्धी व्हावी यासाठी एम.आर.ई.जी.एस. च्या माध्यमातून गावोगावी विहिरी व शेततळे निर्मितीसाठी अनुदान दिले जाते. या कामांच्या माध्यमातून मजुरांना काम तर शेतकऱ्याची जमीन सिंचनाखाली यावी. हा प्रमुख उद्देश असतो. परंतु शासनाच्या जाचक अटी व लालफितीच्या कारभारामुळे या योजना पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अशाही स्थितीत मंजूर झालेल्या योजनेचे काम पूर्ण होऊन त्या योजनेचे अनुदान मिळेपर्यंत शेतकऱ्यांस किमान दोन वर्षे कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. अंबाजोगाई तालुक्यात आजपर्यंत कृषि विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत ४७० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र गेल्या दोन वर्षात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे झाली नाहीत. या वर्षी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून २६ शेततळ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यातील १३ प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ही कामे आता सुरू करण्यात येणार असल्याचे कृषि विभागाच्या वतीने सांगण्यात आले. पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतात विहिर घेण्यासाठी अनुदान दिले जाते. आजपर्यंत १३६० विहिरींना मंजुरी मिळाली त्यापैकी ९७१ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. ४३८ विहिरींचे काम तांत्रिक अडचणींमुळे रखडले आहेत. आगामी काळात २०० विहिरींना मंजुरी मिळाली आहे. तर ९८ विहिरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहेत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ही कामे करतांना जॉबकार्ड व विविध तांत्रिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्यामुळे ही कामे मार्गी लागेपर्यंत त्यातच मिळणारा निधी हे अग्निदिव्य पार करतांना शेतकऱ्यांची मोठी कोंडी होते.