शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

विनामशागतीचे शेती तंत्रज्ञान छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांनी स्वीकारले, काय आहेत फायदे ?

By बापू सोळुंके | Published: April 04, 2024 7:32 PM

यामुळे पिकाला पोषक असे सेंद्रिय कर्ब आणि जीवाणूंची संख्या वाढण्यासाठी जमिनीची मशागत करू नका, असे सांगणारे एसआरटी तंत्रज्ञान दहा वर्षांपूर्वी कोकणात भातशेतीमध्ये वापरले जाऊ लागले.

छत्रपती संभाजीनगर : कोकणात भातशेतीसाठी वापरलेले जाणारे विनामशागतीचे तंत्रज्ञान सगुणा राइस तंत्रज्ञान (एसआरटी) आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरीही स्वीकारू लागले आहेत. जिल्ह्यातील बाराशे शेतकऱ्यांनी गतवर्षी तब्बल अडीच हजार एकर शेती विनामशागतीची केली.

पारंपरिक पिकांच्या तुलनेत या शेतीतून मिळणारे उत्पादन वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय नांगरणे, वखरणे, कोळपणे आणि निंदणे इ.वर होणारा खर्चही कमी झाल्याने हे तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचा दावा कृषी अधिकारी करतात. कोणत्याही पिकाची चांगली वाढ होण्यासाठी जमिनीचा पोत चांगला असावा लागतो. पोत उत्तम राहण्यासाठी जमिनीत सेंद्रिय कर्ब, गांडूळ, जीवाणूंची चांगली वाढ होणे आवश्यक असते. यासाठी जमिनीतच तण, पिकांची मुळे, खुंट राहू देणे, काडी, कचरा, गवत सडू देणे आवश्यक असते. मात्र आपल्याकडे दरवर्षी शेतीची नांगरणे, वखरणी, रोटाव्हेटर करणे इ. मशागतीची कामे करण्यात येतात.

खरीप हंगामापूर्वी शेतकरी शेतात साफसफाई करतात. यामुळे जमिनीमध्ये जीवाणूंची वाढ होत नाही. यामुळे पिकाला पोषक असे सेंद्रिय कर्ब आणि जीवाणूंची संख्या वाढण्यासाठी जमिनीची मशागत करू नका, असे सांगणारे एसआरटी तंत्रज्ञान दहा वर्षांपूर्वी कोकणात भातशेतीमध्ये वापरले जाऊ लागले. गादी वाफा पद्धतीने शेती करावी. गादी वाफ्यात पिकाची लागवड, पेरणी करावी. दरवर्षी पीक बुडापासून कापून घ्यावे, पण पिकाची मुळे, खुंट, खोड जमिनीतच राहू द्यावी, असे हे तंत्रज्ञान सांगते. २०१९ रोजी कन्नड तालुक्यातील टापरगाव येथील मोजक्याच शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून विनामशागतीची शेती सुरू केली. त्यांना या शेतीतून मिळणारे उत्पादन वाढले आणि खर्चही कमी झाला. कन्नडसह फुलंब्री, सिल्लोड, साेयगाव, गंगापूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर आणि पैठण तालुक्यातील एकूण बाराशे शेतकऱ्यांनी हे तंत्र स्वीकारले. ही माहिती एसआरटी तंत्रज्ञानाचे मार्गदर्शक तथा निवृत्त कृषी अधिकारी सुरेशसिंग बेडवाल यांनी दिली.

मजुरावरील खर्चही कमीआमची दहा एकर शेती चार वर्षांपासून विनामशागतीची आहे. पारंपरिक शेतीसाठी नांगरणे, वखरणे, लागवडीनंतर कोळपणी आणि निंदण यावर होणारा खर्च या तंत्रज्ञानात वाचतो. तणनाशकाचा वापर करतो. यामुळे मजुरावरील खर्चही कमी झाला. जमिनीत सेंद्रिय कर्ब टिकून राहत असल्याने उत्पादनात दुपटीने वाढ झाली आहे.- प्रभाकर सुसलोदे, शेतकरी, रुईखेडा, ता. कन्नड

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र