शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

शेततळ्यांचे प्रस्ताव पाच हजारांवर

By admin | Published: March 20, 2016 12:26 AM

राजेश खराडे , बीड मागेल त्याला शेततळे या योजनेचा मोठा गाजावाजा झाला असल्याने शेतकऱ्यांना त्याबाबत योग्य ती माहिती मिळाली आहे.

राजेश खराडे , बीड मागेल त्याला शेततळे या योजनेचा मोठा गाजावाजा झाला असल्याने शेतकऱ्यांना त्याबाबत योग्य ती माहिती मिळाली आहे. अनुदान रक्कम कमी असली तरी दिवसेंदिवस प्रस्तावांच्या संख्येत वाढ होत आहे. अद्यापपर्यंत ५,२९८ प्रस्तावांची नोंदणी झाली आहे, तर प्रत्यक्षात आॅनलाईनद्वारे ४ हजार ७०९ प्रस्ताव जिल्ह्यातून येथून कृषी अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आहेत. आॅनलाईनद्वारे प्रस्तावाचा २० दिवसांचा कालावधी लोटला असून, दरम्यान ४ हजार ७०९ शेतकऱ्यांनी ७/१२, ८-अ व इतर कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव दाखल केले आहेत. जिल्ह्याकरिता २ हजार ४८० शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. दुष्काळाची दाहकता आणि पाणी साठवणुकीचे महत्त्व कळाल्यामुळे शेतकरीही शेततळ्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहेत. या योजनेचा तळागाळातील शेतकऱ्यांना लाभ घ्यावा, याकरिता शेतकऱ्यांच्या बैठका, बॅनरबाजी, तसेच कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावार जाऊन त्यांना शेततळ्याचे महत्त्व पटवून देणे अनिवार्य होते; मात्र येथील कृषी अधिकारी उदासीन असून, केवळ शेतकऱ्यांच्या उत्साहामुळे लाभार्थींची संख्या वाढत आहे. दुर्दैव म्हणजे तंत्र विभागातील अधिकाऱ्यांना जिल्ह्यातून किती प्रस्ताव दाखल झाले, तालुकानिहाय शेततळ्यांची अवस्था काय, याची माहितीदेखील उपलब्ध नाही. मागेल त्याला शेततळे या महत्त्वपूर्ण योजनेकडे अधिकाऱ्यांने असे दुर्लक्ष केले तर शेतकऱ्यांचाही उत्साह मावळणार आहे. योग्य ती माहितीही शेतकऱ्यांना दिली जात नाही. शेतकऱ्यांची अवस्था आणि दुष्काळाची दाहकता यांचे सोयरसूतक नसल्यासारखे तंत्र विभागातील अधिकारी वागत आहेत.