शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

राज्यात रक्त संकटाची भीती,‘ब्लड ऑन कॉल’ योजना बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 5:24 PM

या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शासकीय रक्तकेंद्रामध्ये अत्यल्प वेतनावर प्रत्येकी रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, तंत्रज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली होती.

औरंगाबाद : संपूर्ण राज्यातील शासकीय रक्त केंद्रांमध्ये २०१३ पासून सुरू असलेली रुग्णहिताची ‘ब्लड ऑन कॉल’ (जीवन अमृत सेवा) ही योजना १ एप्रिलपासून बंद केल्यामुळे संपूर्ण राज्यभरातील शासकीय रक्तकेंद्रात रक्ताचे मोठे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याबरोबर राज्यभरातील १०९ कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

शासकीय रक्त केंद्रांचे बळकटीकरण करण्यासाठी व गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे, नातेवाईकांना रक्तासाठी धावपळ करण्याची गरज पडू नये, यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून राज्यभरातील शासकीय रक्तकेंद्रामध्ये ऑक्टोबर २०१३ मध्ये ब्लड ऑन कॉल (जीवन अमृत सेवा) योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शासकीय रक्तकेंद्रामध्ये अत्यल्प वेतनावर प्रत्येकी रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, तंत्रज्ञ यांची नियुक्ती करण्यात आलेली. या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे रक्त संकलनात वाढ होण्यास मदत झाली. तसेच इतरही कामकाजात मोठी मदत मिळालेली होती. परंतु ही योजना ३१ मार्च रोजी कायमस्वरूपी बंद करण्यात आली. त्यामुळे आता या योजनेच्या अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक व तंत्रज्ञ यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठाकर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीमुळे संपूर्ण राज्यातील शासकीय रक्तकेंद्रामध्ये रक्ताचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनेक रक्तकेंद्रांत सध्याच दोन ते तीन दिवस पुरेल, एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे, असे सेवासमाप्त कर्मचाऱ्यांनी सांगितले.

शासनाचा निर्णयहा शासनाचा निर्णय आहे. त्यामुळे योजनेतील कर्मचाऱ्यांची सेवाही संपुष्टात आली आहे. रक्तपेढीत नियमित कर्मचारी कार्यरत असतात.- डॉ. अरुण थोरात, सहसंचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद

२४ तास सेवा दिलीगेल्या ८ वर्षांपासून औरंगाबादेतील विभागीय रक्तपेढीत वैद्यकीय समाजसेवक म्हणून काम केले. २४ तास सेवा दिली, पण आता काढून टाकले. राज्यभरातील १०९ कर्मचाऱ्यांवर अशीच वेळ आली आहे.- हनुमान रुळे

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीAurangabadऔरंगाबाद