शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शासकीय कार्यालयांमध्ये घाण दिसल्यास १० हजार रुपयांचा दंड; मनपा करणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 18:56 IST

महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिसांचा संयुक्त निर्णय

छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये सामान अस्ताव्यस्त पडलेले असते. जिकडे बघितले तिकडे धूळ, फायलींचे गठ्ठे असे विदारक चित्र पाहायला मिळते. आता कार्यालये साफ नसल्यास दहा हजार रुपये दंड लावण्यात येईल. दंडाची रक्कम कार्यालय प्रमुखाला खिशातून द्यावी लागेल. महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे हा निर्णय घेतल्याची माहिती मनपा प्रशासकांनी दिली.

महापालिकेने १ ते १५ ऑगस्टपर्यंत शहरात स्वच्छता अभियान राबविले. १ हजार टन सुका-ओला कचरा उचलला. विविध, संस्था, संघटनांनी या महास्वच्छता अभियानात सहभाग घेतला. महापालिका मुख्यालयातही स्वच्छता अभियान राबविले. ज्या विभागात उणीव दिसून आली तेथे २१ जणांना आर्थिक दंड लावला. सर्वोत्कृष्ट विभाग म्हणून लेखा व वित्त विभागाने बाजी मारली. द्वितीय क्रमांक लेखापरिक्षण, तृतीय क्रमांक विद्युत विभागाला मिळाला. त्यानंतर ही मोहीम आता शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये राबविली जाईल. भिंतीवरील पिचकाऱ्या, लोखंडी कपाटावर फायलींचे गठ्ठे, धुळीचे साम्राज्य असे अजिबात चालणार नाही. यापुढे एखाद्या शासकीय कार्यालयात घाण दिसून आल्यास दंड लावणार असल्याचे मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.

‘ते’ कारवाई करू शकतात तर...पोलिस, लाचलुचपत विभागासह अन्य विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी इतर शासकीय ठिकाणी जाऊन कारवाई करू शकतात. त्याचप्रमाणे स्वच्छतेसंदर्भात महापालिकाही त्यांच्या कार्यालयात जाऊन कारवाई करू शकते. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. त्यामुळे आता ठोस कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे प्रशासकांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न