शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

अग्निशमन केंद्रांची वानवा

By admin | Published: January 02, 2015 12:31 AM

अशोक कांबळे, औरंगाबाद शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचाऱ्यांची वानवा आहे़

अशोक कांबळे, औरंगाबादशहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचाऱ्यांची वानवा आहे़ निसर्गनिर्मित संकट अथवा काही आपत्ती आल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी किमान ८ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता आहे; परंतु सद्य:स्थितीत शहरात केवळ तीनच केंद्रे असून, त्यामध्येही अपुरी कर्मचारी संख्या आहे. विशेष म्हणजे सरकारची मान्यता असूनही महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे पाच अग्निशमन केंद्रांची उभारणी होऊ शकली नाही. सद्य:स्थितीत शहराची लोकसंख्या १३ लाखांच्या घरात आहे़ औद्योगिकरणामुळे येत्या काही काळात शहराची लोकसंख्या वेगाने वाढणार आहे. एखादे निसर्गनिर्मित किंवा मानवनिर्मित संकट ओढावले, तर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात किमान ८ अग्निशमन केंद्रांची गरज आहे; परंतु प्रत्यक्षात मात्र शहरात सिडको, चिकलठाणा व रेल्वेस्टेशन परिसर अशा केवळ तीनच ठिकाणी अग्निशमन केंदे्र आहेत. विशेष म्हणजे या तीन केंद्रांवर पुरेसे कर्मचारी नाहीत़ त्यामुळे निम्म्या कर्मचाऱ्यांवरच कामाचा अतिरिक्त भार पडत असल्याने त्यांच्यावर १८ ते २० तास काम करण्याची वेळ येत आहे़ शहरात आणखी पाच नवीन केंद्रे निर्माण करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे; परंतु प्रशासनाकडून केंद्र उभारणीसाठी कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत़ अपुरे कर्मचारीशहरात तीन ठिकाणी असलेल्या अग्निशमन कें द्रांमध्ये एकूण ८१ पदे मंजूर आहेत; परंतु सध्या ५१ कर्मचारी कार्यरत असून तब्बल ३० पदे रिक्त आहेत़ स्टेशन आॅफिसर १, उपअग्निशमन अधिकारी ४, अग्निशमनप्रमुख १, ड्रायव्हर आॅपरेटर ४, अग्निशामक १२, टेलिफोन आॅपरेटर ५ व लिपिक १ अशी पदे रिक्त आहेत़ अनेक वर्षांपासून वाढीव पदांसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला आहे; परंतु त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही़ विशेष म्हणजे कार्यरत असलेले कर्मचारी जवळपास ४० ते ५० या वयातील असल्याने त्यांना धावपळीचे काम करताना मर्यादा पडत आहेत़ स्वत:ची रुग्णवाहिका नाहीआपत्कालीन परिस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विभाग असलेल्या अग्निशमन केंद्राकडे अद्याप स्वत:ची एकही रुग्णवाहिका नाही़ आपत्कालीन काळात अग्निशमन केंद्राला दुसऱ्यांच्या रुग्णवाहिकेवर अवलंबून राहावे लागते़ त्यामुळे अनेकदा रुग्ण वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावण्याची शक्यता निर्माण होते़ अग्निशमन कें द्राकडे स्वत:ची रुग्णवाहिका असणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु याकडे कोणीच लक्ष देत नाही़