शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आधी आम्ही ५० होतो, नंतर भाजपचे १०५ येऊन मिळाले; येत्या विधानसभेत २०० निवडून आणू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 12:11 IST

शिवसेना-भाजपचे सरकारला तुमचा पाठिंबा आहे का ? अशी विचारणा उपस्थित जनसागराला केली. तरुणाईने हात वर करून होकार दिला.

औरंगाबाद : आधी आम्ही ५० होतो, नंतर १०५ येऊन मिळाले, आगामी विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपच्या २०० जागा निवडून आणू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला.

आ. प्रदीप जैस्वाल यांच्या नारळीबाग येथील संपर्क कार्यालयाास सदिच्छा भेट दिल्यानंतर उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर आ. जैस्वाल, आ. संजय सिरसाट, आ. संदीपान भुमरे, आ. अतुल सावे, आ. नारायण कुचे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर काम करत आहोत. आम्ही घेतलेल्या भूमिकेचे स्वागत राज्यातील जनता करत आहे. मला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी रात्री ३ वाजेपर्यंत मालेगावातील नागरिक रस्त्यावर उभे होते. तुमचेही प्रेम तेवढेच असल्याचे या गर्दीवरून दिसते. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघाचे पालकत्व मी स्वीकारले आहे. विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ७०० मी.मी. व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी २०० कोटी रुपये मंजूर केल्याचे त्यांनी आर्वजून सांगितले. लेबर कॉलनीतील रहिवाशांचा प्रश्न सोडविणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणारजिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी क्रांतीचौकात मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. रात्री ११.२० मुख्यमंत्री तेथे पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेना-भाजपचे सरकारला तुमचा पाठिंबा आहे का ? अशी विचारणा उपस्थित जनसागराला केली. तरुणाईने हात वर करून होकार दिला. सारथी, बार्टी आणि महाज्योती संस्थेचे प्रश्न सोडविणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ओबीसीच्या धर्तीवर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबादBJPभाजपाPradeep Jaiswalप्रदीप जैस्वालShiv Senaशिवसेना