शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
2
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
3
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
4
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
5
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
6
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
7
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
9
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
10
संपादकीय: अभिजात मराठी!
11
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
12
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
13
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
14
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
15
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
16
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
18
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
19
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
20
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला

आत्महत्या रोखण्यासाठी ‘मत्स्य’चा हातभार

By admin | Published: November 25, 2015 10:58 PM

बीड : शेती पिकली नाही म्हणून निराश न होता शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून मत्स्यव्यवसाय करावा, यासाठी मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून विशेष योजना अंमलात आणली आहे.

बीड : शेती पिकली नाही म्हणून निराश न होता शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून मत्स्यव्यवसाय करावा, यासाठी मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून विशेष योजना अंमलात आणली आहे. आत्महत्या रोखण्याासाठी मत्स्य व्यवसाय कार्यालयाने उचललेले हे पाऊल शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याने समाधान व्यक्त होत आहे. राज्यात मागील काही वर्षांपासून दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करू लागला आहे. यामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. बीडचा आकडाही पावने तिनशेच्याजवळ जावून पोहचला आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून मत्स्य व्यवसायासंदर्भात योजनांची अंमलबजावणी करता यावी, यासाठी ८ एप्रिल २०१५ ला मुख्यमंत्र्यांकडे एक प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर १२ जुलै रोजी मंत्रीमंडळाची बैठक झाली आणि ३० जुलै २०१५ ला योजनेचा शासन निर्णय काढण्यात आला. त्यानंतर ही योजना संपूर्ण राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा बीडमध्ये लाभ घेण्यास सुरूवात झाली असून, मत्स्यबीजासाठी १४ अर्ज आले असून ९ अर्ज फिरते वाहन देण्यात यावे, यासाठी आले आहेत.१०० टक्के अनुदानकृषी विभागाने बांधुन दिलेल्या शेततळ्यांमध्ये मत्स्यबीज व कोळंबी संचयन कार्यक्रम १०० टक्के अनुदान तत्वावर राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसे शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमुदही करण्यात आलेले आहे. तसेच एका तलावात एक हजार मत्स्य बोटुकली आणि एक हजार कोळंबी बीज संचयन करण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)