शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

पंचायत विकास निर्देशांक स्पर्धेत उतरणार पाच ग्रामपंचायती

By विकास राऊत | Published: January 06, 2024 1:15 PM

८७० पैकी ४४ ग्रामपंचायतींनी वाढविला उत्तम निर्देशांक

छत्रपती संभाजीनगर : गावांच्या शाश्वत विकासासाठी विविध कल्याणकारी योजना हाती घेण्यात आल्या असून, केवळ योजनाच नाही, तर ग्रामपंचायतस्तरावर आरोग्य, सार्वजनिक सुविधा, महिलांची प्रगती, शिक्षण तसेच कचरा आणि सांडपाण्याचे उत्तम नियोजन यावर मागील काही महिन्यांपासून सर्वच काम केले जात आहे. आता याच कामांवर पंचायत विकास निर्देशांक ठरणार असून, एप्रिलमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत ४४ पैकी जिल्ह्यातील उत्कृष्ट निर्देशांक असलेल्या ५ ग्रामपंचायती सहभागी करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे.

केंद्र शासनाने गावांची समृद्धी वाढविण्यासाठी तिथे शाश्वत विकासाच्या कामांवर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. या माध्यमातून नऊसुत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये गरिबीमुक्त गाव, आरोग्यदायी गाव, बाल-स्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ हरित गाव, पायाभूत सुविधांनी युक्त गाव, सामाजिक न्याय व सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासनयुक्त गाव, महिलास्नेही गाव आदींचा समावेश असणार आहे. यावरच ग्रामपंचायतींचा ‘पंचायत विकास निर्देशांक’ (पीडीआय) ठरणार आहे.

सन २०२२ - २३ मधील माहितीच्या आधारावर हा निर्देशांक तयार करण्यात येणार आहे. या निर्देशांकामध्ये ग्रामपंचायत विकासाच्या कमकुवत बाबी व बलस्थाने निश्चित होणार आहेत. या माध्यमातून निर्माण होणारा माहिती संग्रह जिल्हा, राज्य व केंद्र पातळीवर विकास नियोजन प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहे. या निर्देशांकाचा उपयोग ग्रामपंचायतींना कोणती कामे तसेच कोणते उपक्रम राबवायचे आहेत, यासाठी दिशादर्शक म्हणून उपयोगात येणार असून, सन २०२३- २४ मध्ये तयार होणारा हा निर्देशांक बेसलाइन इन्फॉर्मेशन म्हणून वापरला जाणार आहे.

विकासाची स्पर्धा असावीजिल्ह्यात विकासकामे राबविली जात आहेतच. पण, गावागावात विकासाची स्पर्धा झाली पाहिजे. म्हणूनच केंद्र शासनाने ‘पंचायत विकास निर्देशांक’ (पीडीआय) निश्चित करून राज्य व राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जिल्ह्यातील ४४ ग्रामपंचायतींचा विकास निर्देशांक चांगला आहे. तरीही अत्युत्तम निर्देशांक असणाऱ्या ५ ग्रामपंचायती राज्य स्पर्धेत सहभागी करण्याचा आपला विचार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायत