शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

झरा आटला, जीव थकला़़़

By admin | Published: March 13, 2016 2:36 PM

नांदेड - तापमानात वाढ होत असल्याने दिवसेंदिवस पाणीटचाईचे चटके सोसावे लागत आहेत.

नांदेड - तापमानात वाढ होत असल्याने दिवसेंदिवस पाणीटचाईचे चटके सोसावे लागत आहेत. त्याचा परिणाम विहिरी, बोअरमधील पाणीपातळी घटल्याने आजघडीला मुखेड तालुक्यातील ७४ गावांत ५९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील सावरगाव, दापका गुंडोपंत, जांब, बाऱ्हाळी, रत्त्नातांडा, मानसिंगतांडा यासह अनेक वाडी-तांड्यावर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून टँकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी नागरिकांसह महिला लहान मुलांची झुंबड उडत आहे. अनेक ठिकाणी पाणी घेण्यावरुन किरकोळ भांडणतंटेही होत आहेत. पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न निर्माण झाल्याने अंघोळीला वापरलेले पाणी धुण्यासाठी पुन्हा वापरण्यात येत असल्याचे चित्रही मुखेड तालुक्यातील काही भागात पहावयास मिळाले. याशिवाय जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याच प्रश्न गंभीर होत असल्याने मोठ्या संख्येने जनावरे विक्रीसाठी आठवडी बाजारात आणली जात आहेत. त्यामुळे जनावरांचे भावही कमी झाले असून घेण्यासाठी कोणीही धजावत नसल्याचेही चित्र दिसत आहे. पाणीटंचाईमुळे अनेक गावातील नागरिक स्थलांतरित होत असून पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे़ ही परिस्थिती पुढील महिन्यात अधिक भयावह होणार आहे़ दुष्काळाच्या झळांनी वाडी, वस्ती, तांड्यावरील गोरगरीब माणूस होरपळून निघाला आहे़ पिण्यासाठी पाणी नाही, हाताला काम नाही़़़ अशा परिस्थितीत जगायचे कसे? असा प्रश्न उपस्थित करून शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब माणूस शेतशिवार वाऱ्यावर सोडून व घराला कुलूप लावून मुलांबाळांसह वाट मिळेल तिकडे निघाला आहे़ गावात राहिलेले मात्र पाण्यासाठी संघर्ष करत आहेत़ मुखेड तालुक्यातील दापका आणि भवानीतांडा या गावातील पाण्यासाठी चाललेली ही लढाई भयान अशी आहे़ अबालवृद्धांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे़ उन्हाच्या चटक्यांसोबतच पाण्याच्या झळांनी गावे ओस पडली आहेत़