शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

नांदेडच्या धावपट्टीवरुन पुन्हा विमानाचे उड्डाण

By admin | Published: March 20, 2016 12:58 AM

नांदेड : नांदेडसह राज्यातील २० विमानतळे रिकामी असताना, महाराष्ट्रासाठी आलेले ८० प्रवासी क्षमतेचे विमान मुंबई येथून गुजरातसाठी जाते़

नांदेड : नांदेडसह राज्यातील २० विमानतळे रिकामी असताना, महाराष्ट्रासाठी आलेले ८० प्रवासी क्षमतेचे विमान मुंबई येथून गुजरातसाठी जाते़ ही बाब एअर इंडियाच्या लक्षात आणून देत, माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी नांदेडची विमानसेवा पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत़ दरम्यान, लवकरच कमी प्रवासीक्षमता असलेले विमान नांदेडच्या धावपट्टीवरुन उड्डाण करेल अशी शक्यता वर्तविली जात आहे़राज्यातील विमानतळांच्या यादीत नांदेडचे विमानतळ सुसज्ज व सर्व सुविधांनी परिपूर्ण आहे़ प्रदीर्घ काळ दिल्ली तसेच मुंबई येथून नांदेडसाठी विमानसेवा सुरु राहिली होती़, परंतु प्रवाशांची अनाठायी अडचण समोर करीत, विमानसेवा बंद करण्यातच यंत्रणेने आपला वेळ खर्ची केला़ दरम्यान, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेवून विकसनशील भागांना जोडणारी विमानसेवा सुरु ठेवावी अशी आग्रही मागणी केली़ मागील सत्ताकाळात राज्यामध्ये २० विमानतळे विकसित झाली़ नांदेड येथे शीख बांधवांचे पवित्र स्थळ सचखंड गुरुद्वारा आहे़ जगभरातून शीख बांधव नांदेडला येतात़ तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या शहराला व्यापार व उद्योगाच्या विकासासाठी विमानसेवेचा मोठा लाभ होवू शकतो़ त्यामुळे किमान एअर इंडियाने तरी, कमी प्रवासी क्षमतेचे विमान राज्यातील महत्वाच्या विमानतळावरुन उड्डाण करेल याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली होती़ नांदेड येथून यापूर्वी गो एअर आणि किंगफिशर या दोन कंपन्यांची विमाने उड्डाण करीत होती़ सुरुवातीला गो एअर आणि त्यानंतर किंगफिशरने सेवा बंद केली़नांदेड येथून केवळ नांदेडच नव्हे तर परभणी, हिंगोली, लातूर, बीड या जिल्ह्यांनाही हवाई वाहतुकीचा लाभ होणार आहे़ सद्य:स्थितीत औरंगाबाद अथवा हैदराबाद येथूनच सदर सुविधा उपलब्ध होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते़ ज्यामुळे उद्योग व्यवसायासाठी येणारी मोठी शिष्टमंडळे, उच्च तंत्रज्ञानाशी निगडित मनुष्यबळ सहजपणे उपलब्ध होत नाही़ एकूणच या भागाच्या विकासासाठी नांदेडच्या सुसज्ज विमानतळावरुन एअर इंडियाचे कमी क्षमतेचे विमान धावले पाहिजे, अशी आग्रही मागणीही खा़ अशोकराव चव्हाण यांनी केली आहे़ या अनुषंगाने एअर इंडियाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून नांदेडच्या धावपट्टीवरुन लवकरच विमान उड्डाण करेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे़ (प्रतिनिधी)