शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

महापालिकेच्या वार्ड आरक्षण सोडतीवर येणार आक्षेपांचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 16:31 IST

अत्यंत मनमानी पद्धतीने वॉर्ड फोडण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देपहिल्याच दिवशी मनपाच्या निवडणूक विभागात सहा आक्षेप दाखल

औरंगाबाद : महापालिकेने सोमवारी वॉर्ड आरक्षणासाठी सोडत घेतली. याचवेळी ११५ वॉर्डांची नवीन रचना जाहीर केली. अत्यंत मनमानी पद्धतीने वॉर्ड फोडण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मोजक्याच राजकीय मंडळींचे हित जोपासण्यासाठी हा सर्व खटाटोप केल्याचा आरोप उघडपणे होत आहे. मनपा प्रशासनाने वॉर्ड रचना, सोडतीवर आक्षेप स्वीकारण्यास सुरुवात केली. पहिल्याच दिवशी सहा आक्षेप दाखल झाले.

महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे ११ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप स्वीकारले जाणार आहेत. पुढील सात दिवसांमध्ये निवडणूक विभागाकडे आक्षेपांचा महापूर येणार आहे. या सर्व आक्षेपांवर राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी सुनावणी घेणार आहेत. महापालिकेने प्रकाशित केलेले नकाशे आणि प्रत्यक्षात वॉर्डाची चतु:सीमा यात बराच फरक पडत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. भौगोलिक रचनेचा कुठेही विचार करण्यात आलेला नाही. संजयनगर सी या भागात एकाच अंतर्गत रोडवर तीन वॉर्डांचा समावेश केल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. संजयनगर हा जुना वॉर्डच गायब करण्यात आला आहे. या वॉर्डाचे मतदार तीन इतर वॉर्डांमध्ये टाकण्यात आले आहेत.

रस्ता ओलांडून वॉर्ड तोडू नये असे निकष निवडणूक आयोगानेच ठरवून दिलेले आहेत. या सर्व निकषांची पायमल्ली वॉर्ड रचनेत झाली आहे. त्याचप्रमाणे वॉर्ड आरक्षण सोडतीवर आक्षेप नोंदविण्यात येत आहेत. सोमवारी पहिल्याच दिवशी मनपाच्या निवडणूक विभागाकडे ६ आक्षेप प्राप्त झाले. याशिवाय आक्षेप, हरकती नोंदविण्यासाठी अनेकांनी या विभागात भेट देऊन चौकशी केली. आक्षेप आणि हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत ११ फेब्रुवारी आहे. या मुदतीत शेकडो आक्षेप, हरकती दाखल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक