शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

लोकसभेत भाजपच्या विजयासाठी खा. जलीलांना उभे करावे लागेल; दानवेंनी सांगितला फॉर्मुला

By विकास राऊत | Updated: August 22, 2023 13:19 IST

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप व एमआयएमच्या छुप्या मैत्रीवर शिक्कामोर्तब केले.

छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे खा. इम्तियाज जलील व आमची वेगळी दोस्ती आहे. भाजपकडून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड असो किंवा इतर कुणीही आमचा उमेदवार असो. त्याला निवडून आणण्यासाठी आम्हाला खा. जलील यांना उभे करावेच लागते, असे विधान करून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप व एमआयएमच्या छुप्या मैत्रीवर शिक्कामोर्तब केले.ते सोमवारी दिशा समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. डॉ. कराड यांनी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त केली त्यात वावगे काय आहे, उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त करावीच लागते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे, इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत. भाजप उमेदवारीसाठी समिती आहे. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आहे. उमेदवारी मागण्याचा सर्वांना अधिकार असल्याचे दानवे म्हणाले, राज्यात भाजपचे नुकसान होईल, असे बोलले जात आहे. या पोकळ बातम्या असल्याचे ते म्हणाले. मागणी व पुरवठ्यावर मालाच्या किमती कमी-जास्त होतात. त्याचा केंद्र सरकार अंदाज घेत असते. कांद्याबाबतच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असले तरी कधी न कधी ते होत असते. याचा अर्थ मी शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, असे नाही. ग्राहक व शेतकऱ्यांचे हित पाहिले पाहिजे, असे दानवे म्हणाले.

दानवेंच्या विधानावर खा. जलील म्हणाले,दानवे यांना पत्रकारांनी विचारले की, खा. जलील हे पुन्हा निवडून येतील, त्यावर दानवे आधी जलीलच म्हणाले आम्ही पुन्हा येऊ. पुढे दानवे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत खा. जलील आम्हाला लागतील.

ते सगळे आमच्या ताटात जेवून गेलेले खरकटे...सहकारमंत्री दिलीप वळसे म्हणाले, खा. शरद पवारांच्या जिवावर राज्यात सरकार आलेले नाही. यावर बोलताना दानवे म्हणाले, मी अनेक वेळा सांगितले आहे, मायावती, जयललिता, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जीने स्वबळावर सरकार आणले. कोणत्याही प्रादेशिक पक्षाचे राज्यात स्वबळावर सरकार आलेले नाही. हे खरे आहे तसेच सहकार मंत्री वळसे जे बोलले ते देखील खरेच आहे. कुणाला तरी सोबत घेतल्याविना राज्यात सरकारच येत नाही. असे असताना आम्हाला सगळे जातीवादी ठरवतात. मायावती मुख्यमंत्री असताना भाजपचा उपमुख्यमंत्री होता. नितीशकुमार एनडीएमध्ये रेल्वेमंत्री होते. ओमर अब्दुल्ला, ममता बॅनर्जी अटल सरकारमध्ये होतेच ना. १९८५ मध्ये शरद पवार भाजप एकत्र निवडणूक लढले. हे सगळे आमच्या ताटात जेवून गेलेले खरकटे आहेत.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभा