शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

मध, डिंक, गोडंबीसह ‘वनधन’ पुन्हा मिळणार; बंद पडलेला उपक्रम लवकरच सुरू होणार

By साहेबराव हिवराळे | Published: September 20, 2022 9:09 PM

वन विभागातील दोन वर्षांपूर्वी बंद पडलेले ‘वनधन’चे दुकान आता नव्याने सुरू होत असल्याने ‘वनधन’ शहरवासीयांसाठी उपलब्ध होईल.

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात बंद पडलेल्या 'वनधना'ची दुकाने पुन्हा बहरणार असून, दुर्मीळ ‘वनधन’ शहरवासीयांना मिळणार आहे. वनातील मध, डिंक, बिब्याच्या गोडंबीसह ‘वनधन’ रानभाज्याही शहरवासीयांना चाखता येणार आहेत. आरोग्यदायी ‘वनधन’ आणि रानभाज्या आता १२ महिने उपलब्ध होणार आहेत.

वन विभागाने ग्रामीण आणि वनक्षेत्रातील बचत गटाच्या हाताला काम, तसेच त्यांच्या श्रमाला मोल मिळावे यासाठी एका छताखाली हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला होता. लॉकडाऊनच्या काळात तो बंद पडला. त्यामुळे या दुकानाला टाळे लागले आणि शहरवासीयांची मोठी निराशा झाली होती.

कन्नड येथील बचत गटाला वन विभागाने दुकान उपलब्ध करून दिले. त्या दुकानाची सफाई तसेच पंचनामा करून ते ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या दसरा, दिवाळीत, तसेच एरव्ही बारा महिने वनधन उपलब्ध व्हावे, अशी शहरवासीयांचीही मोठी मागणी असल्याने बंद पडलेला उपक्रम सुरू होत आहे. वन क्षेत्रातील बचत गटाच्या महिलांना या उपक्रमाचा फायदाच होणार आहे. लवकरच शहरवासीयांना ‘वनधन’ मिळेल, असे वन परिक्षेत्र अधिकारी दादा तौर यांनी सांगितले.

रानभाज्या औषधी गुणधर्म असून, त्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. भाजी मंडईत कधी तरी उपलब्ध होतात. त्या कधी तरी आणल्यावर बनवायच्या कशा, याविषयी अनेक नव्या पिढीला माहीत नसते. त्यावरही येथे माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हिवाळ्यात आवर्जून प्रत्येक घरात काही विशिष्ट आरोग्यदायी खाद्यपदार्थ बनविले जातात. परंतु त्यासाठी लागणारे साहित्य हे पूर्णत: दर्जेदार व शुद्ध मिळेलच, याची हमी नसते. ते येथे मिळेल. यासोबतच खेड्यातील आणि वनक्षेत्रालगतच्या महिलांनाही शहरात बाजारपेठ मिळवून देण्याचा वनविभागाचा हा उपक्रम पुन्हा सुरू होत आहे.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद