शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

रोटेगाव-पुणतांबा रेल्वेमार्ग आता विसरूनच जा; मनमाडमार्गे प्रवासाने १२६ कि.मी. चा पडतोय फेरा

By संतोष हिरेमठ | Updated: February 26, 2024 19:31 IST

रोटेगाव-कोपरगाव मार्गही कागदावरच : पुणतांबा, शिर्डीसाठी मनमाडमार्गे प्रवास, १२६ कि.मी. चा फेरा

छत्रपती संभाजीनगर : रोटेगाव-पुणतांबा हा २७ किलोमीटरचा प्रस्तावित रेल्वेमार्ग आता विसरूनच जा, असेच म्हणण्याची वेळ येत आहे. तर या रेल्वे मार्गाला पर्याय म्हणून मांडलेला रोटेगाव-कोपरगाव रेल्वे मार्गही कागदावरच आहे. त्यामुळेच मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना अवघ्या काही अंतरासाठी मनमाडमार्गे १२६ किलोमीटर अंतर प्रवास करून पुणतांबा, शिर्डी गाठावे लागते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ फेब्रुवारी रोजी देशभरातील ५५४ अमृत स्टेशन आणि १,५०० उड्डाण पूल , भुयारी पुलांचे भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पण सोहळा होणार आहे. यामध्ये ‘दमरे’च्या नांदेड विभागातील भोकर, हिमायतनगर, मानवत रोड आणि रोटेगाव रेल्वेस्थानकासह ४८ भुयारी मार्ग, तसेच उड्डाणपुलांचा समावेश आहे. रोटेगाव रेल्वेस्टेशनचा पुनर्विकास होत आहे. मात्र, कागदावरील रेल्वे मार्गांचे काय, असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित होत आहे.

मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या रोटेगाव-पुणतांबा या रेल्वेमार्गासाठी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ, दिवंगत कामगार नेते विजयेंद्र काबरा, शालिग्राम बसैये, मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनीही प्रयत्न केले. आजघडीला पुणतांबा, शिर्डीसाठी मनमाडमार्गे जावे लागते. त्यामुळे रोटेगाव ते पुणतांबा हे अंतर १२६ किलोमीटर पडते. त्यामुळे हा प्रवास करताना अधिक वेळ लागतो. त्यामुळे रोटेगाव-पुणतांबा हा २७ किलोमीटरचा रेल्वेमार्ग करण्याची मागणी करण्यात आली. गेल्या २५ वर्षांपासून मागणी होत असलेल्या या रेल्वे मार्गात गोदावरी नदी येते. त्यामुळे हा रेल्वे मार्ग तयार करणे रेल्वेसाठी खर्चीक ठरत आहे. यावर पर्याय म्हणून काही वर्षांपूर्वी रोटेगाव-कोपरगाव असा ३५ किलोमीटरचा कॉडलाइनचा पर्याय मांडण्यात आला. या पर्यायी मार्गामुळे रोटेगाव ते पुणतांबा हे अंतर ६९ किलोमीटरने कमी होणार आहे. या नव्या पर्यायाचा प्रस्ताव रेल्वेला पाठविण्यातही आला; परंतु अजूनही हे दोन्ही मार्ग कागदावरच आहेत.

२००९ मध्ये सर्वेक्षणरेल्वे प्रवाशांना मनमाडचा फेरा होऊ नये, या फेऱ्यामुळे लागणारे अधिकचे डिझेल वाचावे व प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी रोटेगाव-पुणतांबा या रेल्वे मार्गाची मागणी करण्यात आली. संघटनांच्या पाठपुराव्यामुळे या मार्गाचे सर्वेक्षण २१ सप्टेंबर २००९ ला पूर्ण करण्यात आले. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत ९७ कोटी होती. त्यानंतरही वेळोवेळी रेल्वे प्रशासनाने सर्वेक्षण, पाहणी केली.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन