शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

समिती स्थापन करून बीड बायपासवर शून्य अपघात धोरणासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:04 IST

बीड बायपासवरील अपघातांची वाढती संख्या रोखण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांवर बंदी घातली. तरीही अपघात घडले. यावर मात करण्यासाठी नागरिकांच्या सूचनांची आवश्यकता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, व्यावसायिकांनी, शैक्षणिक संस्थांनी उपाय सुचवावेत, यासाठी नागरिकांची समिती स्थापन करून शून्य अपघात धोरणासाठी प्रयत्न केले जातील, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले.

ठळक मुद्देपोलीस आयुक्त : राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी अपघातमुक्तीसाठी नागरिकांनी उपाय सुचविण्याचे आवाहन

औरंगाबाद : बीड बायपासवरील अपघातांची वाढती संख्या रोखण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांवर बंदी घातली. तरीही अपघात घडले. यावर मात करण्यासाठी नागरिकांच्या सूचनांची आवश्यकता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, व्यावसायिकांनी, शैक्षणिक संस्थांनी उपाय सुचवावेत, यासाठी नागरिकांची समिती स्थापन करून शून्य अपघात धोरणासाठी प्रयत्न केले जातील, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले.आरटीओ कार्यालयातर्फे आयोजित राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचे सोमवारी छत्रपती शाहू महाराज शिक्षणसंस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महापौर नंदकुमार घोडेले अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता के. टी. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार, ‘सीएसएमएसएस’चे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, डॉ. डी. के. शेळके, डॉ. जी. बी. डोंगरे, अशोक आहेर यांची उपस्थिती होती.यावेळी चिरंजीव प्रसाद म्हणाले, नागरिकांचे सहकार्य मिळत असल्याने परदेशात अपघातांचे प्रमाण कमी आहे. याच सहकार्याची अपेक्षा आपल्याकडेही आहे. महामार्गावर अधिक गतिरोधक टाकता येत नाही. परंतु बीड बायपास जवळजवळ शहरात आला आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी काही पर्याय करावे लागतील. ध्वनिक्षेपकावरून सूचना, बॅरिकेटस् टाकून वाहनांची गती कमी करता येईल. अपघात कमी करण्यासाठी पुरेशा विश्रांतीबरोबर वाहनांची गती कमी ठेवली पाहिजे. ४० कि.मी. गतीचे बंधन केले आहे. ५० कि.मी.च्या वर गती गेल्यास कारवाई केली जाईल. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळाले पाहिजे. बीड बायपास परिसरातील कार्यालय, शाळा, महाविद्यालय आणि नागरिकांनी समितीच्या माध्यमातून अपघात कमी करण्यासाठी उपाय सांगावेत. त्याची आठवडाभरात अंमलबजावणी केली जाईल.महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, माझ्या कर्मभूमीतील पैठण रोड मृत्यूचा सापळा झाला, याचा खेद वाटतो. बीड बायपास व पैठण रोडवरून जीव मुठीत घेऊन जावे लागते. याप्रसंगी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे, श्रीकृष्ण नकाते, स्वप्नील माने, शैलेश लाहोटी, मोटार वाहन निरीक्षक धनंजय थोरे, रवींद्र यादव, एस. एस. सुत्रावे, मंगेश गुरव आदी उपस्थित होते. मोटार वाहन निरीक्षक शाहेद जमादार यांनी सूत्रसंचालन केले.रायडर फे्रंडली हेल्मेटहेल्मेटसंदर्भात तक्रारी केल्या जातात. परंतु रायडर फ्रेंडली हेल्मेट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही प्रवास टाळू शकता का, याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक देशांत आंतरराष्ट्रीय मानके आहेत. परदेशांत तुम्ही सलग चार तास वाहन चालविल्यानंतर वाहन सुरूच होत नाही. चालकाने तासभर विश्रांती घेतल्याशिवाय वाहन सुरूच होणार नाही, असे सॉफ्टवेअर, हार्डवेअर आहे, असेही पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबाद