शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

दिल्लीत जी-२० परिषद २०२३; ४० देशातील ५०० प्रतिनिधी येणार वेरूळ-अजिंठा लेणी पाहण्यास

By विकास राऊत | Updated: September 7, 2022 15:07 IST

पुढील वर्षी भारतात फेब्रुवारी, मे- २०२३ मध्ये येणार शिष्टमंडळ

औरंगाबाद : जी-२० शिखर परिषद प्रथमच भारतात होणार असून, दिल्ली येथे होणाऱ्या या परिषदेचे प्रतिनिधी महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरांसह औरंगाबाद येथील विविध स्थळांना भेटी देणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली.

भारत, इटली व इंडोनेशिया हे तीन देश जी-२० परिषदेचे आयोजन करीत आहेत. फेब्रुवारी २०२३ व मे २०२३ मध्ये जी-२० परिषदेसाठी औरंगाबाद येथे जगभरातील ४० देशांतून सुमारे ५०० प्रतिनिधी भेट देणार आहेत. या अतिमहत्त्वाच्या प्रतिनिधींच्या निवास, सुरक्षा, वाहतूक व इतर अनुषंगिक व्यवस्थेबाबत विभागीय आयुक्तांनी संबंधितांना सूचना दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात जी-२० शिखर परिषदेच्या नियोजनाकरिता पूर्वतयारी बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. प्रसन्ना, जि. प.चे सीईओ डॉ. नीलेश गटणे, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, सा. बां. चे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे आदी अधिकारी उपस्थित होते.

दोन टप्प्यांत येणार शिष्टमंडळ

जी-२० शिखर परिषदेचे सहभागी प्रतिनिधी ९ व १० फेब्रुवारी २०२३ आणि २२ व २३ मे २०१३ रोजी औरंगाबादला भेट देतील. वेरुळ, अजिंठा लेण्यांनाही भेट देणार असून, येथील पर्यटन व औद्योगिक विकासाला अधिक चालना मिळणे शक्य होणार आहे. प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन ठेवण्यासाठी केंद्रेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनCentral Governmentकेंद्र सरकारAjantha - Elloraअजंठा वेरूळ