शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

ईश्वरप्राप्ती हेच मानवी जीवनाचे उद्दिष्ट असावे

By admin | Published: January 17, 2016 11:48 PM

औरंगाबाद : भगवंत श्रीरामाची कथा हे शिकविते की, ईश्वरप्राप्ती हे मनुष्याच्या जीवनाचे उद्दिष्ट असावे, असे विचार महामनस्विनी विदूषी सुश्री प्रवीणा भारती यांनी येथे व्यक्त केले.

औरंगाबाद : भगवंत श्रीरामाची कथा हे शिकविते की, ईश्वरप्राप्ती हे मनुष्याच्या जीवनाचे उद्दिष्ट असावे, असे विचार महामनस्विनी विदूषी सुश्री प्रवीणा भारती यांनी येथे व्यक्त केले. दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने आयोजित श्रीरामकथा ज्ञानयज्ञाला रविवारी सायंकाळी प्रारंभ झाला. त्यावेळी ‘श्रीरामचरित मानस माहात्म्य व सती प्रसंग’ याची कथा प्रवीणा भारती यांनी सांगितली. रामकथा ऐकण्यासाठी डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या मैदानावर भाविकांनी गर्दी केली होती. प्रारंभी, अ‍ॅड.दत्तात्रय गोधनगावकर, सुवालाल नाबरिया, रामविलास सोनी, संघवी, अशोक भबर, धर्मराज आडे, नारायण राठी, अनंत जैस्वाल, छाया अग्रवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. धर्मपीठावर आशुतोष महाराजांचे छायाचित्र लावण्यात आले होते. १८ रोजी रामजन्म आणि बाललीला, १९ रोजी सीता स्वयंवर, २० रोजी दोन वरदान आणि राम वनवास, २१ रोजी शबरी प्रसंग, २२ रोजी किष्किंधा कांड, तर २३ रोजी बिभीषण शरणागती, रावण वध आणि दिवाळी अशा कथा सायंकाळी ५.३० ते ८.३० वाजेदरम्यान सांगण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. श्रीरामकथा ज्ञानयज्ञाअंतर्गत रविवारी सकाळी ११ वाजता कलश यात्रा काढण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे या कलश यात्रेत सहभागी झाले होते.