शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खुशखबर! औरंगाबादहून आखाती देशांना थेट विमानसेवेसाठी हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 18:06 IST

उमरा यात्रेबरोबरच मराठवाड्यातील परदेशी पर्यटक, उद्योगपती, व्यापारी आणि निर्यातदारांच्या दृष्टीनेही आखाती देशांना विमानसेवा सुरू होणे फायदेशीर ठरू शकते.

औरंगाबाद : औरंगाबादहून ‘उमरा’ यात्रेसह आखाती देशात जाण्यासाठी थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून हालचाली सुरू आहेत. यादृष्टीने बुधवारी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उमरा टुर्स ऑपरेटर्स आणि विमानतळाच्या अधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक झाली.

बैठकीस विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष व उद्योजक सुनीत कोठारी, ‘एटीसी’चे सहायक महाव्यवस्थापक विनायक कटके, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंग यांच्यास मराठवाड्यातील उमरा टुर्स ऑपरेटर्स उपस्थित होते. औरंगाबादहून दर महिन्याला ७०० ते ८०० भाविक हे उमरा यात्रेसाठी जातात. आजघडीला त्यांना मुंबईहून जावे लागते. उमरा यात्रेसाठी औरंगाबादहूनच थेट विमानसेवा सुरू झाल्यास मुंबईला जाण्याचा खर्च वाचण्यास मदत होईल. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. उमरा यात्रेबरोबरच मराठवाड्यातील परदेशी पर्यटक, उद्योगपती, व्यापारी आणि निर्यातदारांच्या दृष्टीनेही आखाती देशांना विमानसेवा सुरू होणे फायदेशीर ठरू शकते.

आखाती विमान कंपन्यांकडे पाठपुरावामराठवाड्यातील सर्व टुर ऑपरेटर्सकडून प्रवाशांच्या संख्येची माहिती प्राप्त झाल्यानंतर विमानतळ प्राधिकरण, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशन विविध आखाती विमान कंपन्यांबरोबर पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन