शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

मोबाइल कंपन्यांचं ‘चांगभलं’; दररोज ‘डेटा’ वापरण्याची सक्तीच; न वापरलेला ‘पॅक’ जातो कुठे?

By संतोष हिरेमठ | Updated: March 18, 2024 15:29 IST

‘माझा डेटा, माझा अधिकार’ नाहीच, मोबाइलचा ‘डेटा’ होतो छुमंतर !

छत्रपती संभाजीनगर : एखादी गोष्ट खरेदी केल्यानंतर तिचा वापर कधी करायचा, याचा संपूर्ण अधिकार ग्राहकांना असतो. परंतु मोबाइलचा ‘डेटा’ खरेदी केल्यानंतरही त्यावर ग्राहकांचा म्हणजे मोबाइलधारकांचा अधिकारच नसल्याची परिस्थिती आहे. कारण रिचार्ज मारल्यानंतर दररोज ठरावीक डेटा वापरण्याची जणू सक्तीच होतेय. हा डेटा वापरला नाही तर तोही ‘छुमंतर’ होत असल्याची परिस्थिती आहे.

विविध कंपन्या, खासगी ऑपरेटर्सकडून वेगवेगळ्या रकमेचे रिचार्ज प्लॅन दिले जातात. यात काॅलिंग, एसएमएस आणि ‘डेटा’चा समावेश असतो. दररोज एक जीबी, दीड जीबी, दोन जीबी, अशा प्रकारे ‘डेटा’चा वापर करण्याचे रिचार्ज प्लॅनमध्ये नमूद केलेले असते. यानुसार वापर झाला नाही तर शिल्लक ‘डेटा’ पुढच्या दिवशी, पुढच्या रिचार्जमध्ये समावेश का केला जात नाही, अथवा ग्राहकाला एकाच वेळी महिन्याचा ‘डेटा’ वापरण्याची मुभा का दिली जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही कंपन्या शिल्लक ‘डेटा’ आठवड्याच्या शेवटी वापरण्यासाठी देतात, असे एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, आठवड्याच्या शेवटी नाही तर ग्राहकांनी खरेदी केलेला ‘डेटा’ त्यांना कधीही वापरता आला पाहिजे, अशी मागणी पुढे येत आहे.

अशी आहे ‘डेटा’ची स्थिती? एका कंपनीचा २९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन दररोज २ जीबी डेटा दिला जातो. त्यासाठी २८ दिवसांची मुदत दिली जाते. यानुसार मोबाइलधारकास ५६ जीबी ‘डेटा’ वापरण्यास मिळतो. पण दररोज २ जीबी ‘डेटा’ यानुसारच वापरण्याची सक्ती केली जाते. अनेक मोबाइलधारकांचा ‘डेटा’ वापर कमी असतो. दररोज वापरण्याच्या अटीने त्यांचा ‘डेटा’ एकप्रकारे गायबच होत असल्याची परिस्थिती आहे. मोबाइलधारकांना ५६ जीबी ‘डेटा’ केव्हाही वापरता आला पाहिजे, त्यांचा शिल्लक ‘डेटा’ पुढे ‘कॅरी फाॅरवर्ड’ झाला पाहिजे, अशी मागणी मोबाइलधारकांकडून होत आहे.

ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेतातशिल्लक ‘डेटा’ पुढे कायम राहावा. एक तर ‘डेटा’चे रेट अवाढव्य आहेत. त्यातही त्याचा वापर झाला तर तो इतरांना विकण्याचाच प्रकार खासगी ऑपरेटर्सकडून होत आहे. ग्राहकांचा उरलेला ‘डेटा’ पुढे कायम राहिला पाहिजे. रोजच्या रोज वापरण्याची सक्ती नसावी. त्याबरोबर रिचार्जचा कालावधी २८, ५६ दिवस असे न राहता पूर्ण महिन्यानुसार असावा. परंतु खासगी ऑपरेटर्स ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन नफा मिळवीत आहेत.- दीपक जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष, नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकाॅम एम्प्लाॅइज, बीएसएनएल

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMobileमोबाइलInternetइंटरनेट