शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

शिष्यवृत्तीचा घोळ सुरूच

By admin | Published: August 11, 2015 12:44 AM

औरंगाबाद : ज्युनिअर कॉलेज, पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या

औरंगाबाद : ज्युनिअर कॉलेज, पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा घोळ मागील तीन वर्षांपासून चालू असून, संपूर्ण मराठवाड्यात मिळून गतवर्षी सुमारे एक लाखांहून अधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. तर यंदा शिष्यवृत्तीची आॅनलाईन प्रक्रिया अद्याप सुरूच करण्यात आलेली नाही. २०१४-१५ या वर्षात औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांत अकरावीपासून पदव्युत्तरपर्यंत तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज केले. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून ६७ हजार ४८४, अनुसूचित जमाती प्रवर्गातून २ हजार ५६५, इतर मागास प्रवर्गातून ४१ हजार १२१ तर भटके आणि विमुक्त प्रवर्गातून ५४ हजार १४ विद्यार्थी, अशा एकूण १ लाख ६५ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. मराठवाड्यातील इतर चार जिल्ह्यांतही याच प्रमाणात शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्यांची संख्या आहे. मात्र, २०१४-१५ चे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही सुमारे ५० टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले. विद्यार्थी शिष्यवृत्तीबाबत राज्यात सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने २०१३-१४ चा निधी देण्यात दिरंगाई केली. त्याचा परिणाम म्हणून २०१४-१५ साली जो काही निधी मंजूर झाला, तो आधीच्या म्हणजे २०१३-१४ सालच्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आला. नव्याने सत्तेवर आलेल्या युती सरकारनेही शिष्यवृत्तीच्या या प्रश्नाकडे दुर्लक्षच केले आहे. भाजपच्या काही नेत्यांनी ही बाब मुख्यमंत्री, अर्थमंत्री, तसेच सामाजिक न्यायमंत्र्यांच्या निदर्शनासही आणून दिली; मात्र त्याबाबत काहीच हालचाल झाली नाही. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्षातही अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले. शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन प्रक्रिया आहे. मात्र, गतवर्षीचीच शिष्यवृत्ती न देणाऱ्या सरकारने यंदा तर ही प्रक्रियाही सुरू केली नसल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. यामुळे विद्यार्थी प्रचंड कोंडीत सापडला आहे. केवळ शिष्यवृत्तीच्या आधारावर शिक्षण पूर्ण करू पाहणाऱ्या दलित, इतर मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांवर सरकार अन्याय करीत असल्याची प्रतिक्रिया नागसेनवनातील विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येतात. घरातून येताना ते धान्य घेऊन येतात आणि शिष्यवृत्तीच्या पैशातून तेल, तिखट आणि भाजी घेऊन आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्याने ते अडचणीत आल्याची प्रतिक्रिया नागसेनवनातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याने दिली.