शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

जीटीएलचे कर्मचारी आले ‘रस्त्यावर’ !

By admin | Published: November 14, 2014 12:44 AM

औरंगाबाद : महावितरण आणि जीटीएल या दोन वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या अर्थकारणाच्या वादात १ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे.

औरंगाबाद : महावितरण आणि जीटीएल या दोन वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या अर्थकारणाच्या वादात १ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जीटीएलच्या पन्नालालनगर येथील कार्यालयावर निदर्शने करून कंपनी, महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.जीटीएलने ग्राहकांकडून पैसे वसूल केले आहेत; पण ते महावितरणला भरले नाहीत. त्यात आमचा दोष काय? असा प्रश्न जीटीएलचे कर्मचारी करीत आहेत. महावितरणने कारवाई करताना कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी कर्मचारी करीत आहेत. महावितरणचे जीटीएलने वीज बिलापोटी ३९३.७ कोटी रुपये थकविले आहेत. त्यासाठी जीटीएलला कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस महावितरणने दिली आहे. या दोन कंपन्यांच्या पैशांच्या वादात एक हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट आले आहे. महावितरण १६ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपासून शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेणार आहे. महावितरणने शहरातील वीजपुरवठा २०११ मध्ये जीटीएल ऊर्जा कंपनीकडे हस्तांतरित केला होता. या कराराची मुदत १५ वर्षांची होती; पण जीटीएलने गेल्या काही महिन्यांत महावितरणचे बिल थकविले आहे. त्यामुळे कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस जीटीएलला दिली आहे. या नोटिसीमुळे १,०३२ कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे. अचानक नोकरी गेल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. दोन कंपन्यांच्या अर्थकारणात १ हजार ३२ कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय भरडत आहेत. एका चुकीच्या निर्णयामुळे आमच्यावर कुटुंबासह उपासमारीची वेळ येणार आहे. सरकारने कारवाई करताना आमचा विचार करावा, अशा विविध प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.