शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मराठवाड्यात गारपीट; वीज पडून दोन ठार, सहा जनावरांचा मृत्यू, फळबागांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 12:00 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी, वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात अनेक ठिकाणी बुधवारी रात्री आणि गुरुवारी गारपीट झाली. वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. वीज पडून परभणी जिल्ह्यातील दोघांसह सहा जनावरांचा मृत्यू झाला.

गंगाखेड (जि. परभणी) तालुक्यातील इळेगाव येथील शेतशिवारात शेतातील कापूस वेचून घरी निघताना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नरेंद्र धोंडिबा शेळके (६५) या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी मेघगर्जनेसह पाऊस सुरू होता. सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा येथे शेळ्या चरण्यासाठी आलेल्या हरिबाई एकनाथ सुरनर यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. खपाट पिंपरी येथे किशोर खंदारे यांची शेळी व शेळगाव येथे गिरीश हल्गे यांचा बैल वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. परभणी तालुक्यातील साळापुरी गाव शिवारात बुधवारी रात्री आठ वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी दोन ठिकाणी वीज पडून एक गाय व दोन म्हैस दगावले.

बीड जिल्ह्यात विविध भागांत गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. धारूर, वडवणी व गेवराई तालुक्यांत गारा बसरल्या. यामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेवराई तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. धारूर- वडवणी रस्त्यावर पहाडी दहीफळ येथे मोठे झाड पडल्याने वाहतूक काही वेळ बंद होती.

लातूर जिल्ह्यात वीज पडून चार जनावरे दगावलीलातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, औसा तालुक्यातील तीन गावांमध्ये वीज पडून चार जनावरे दगावली. या पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी शहरासह देवणी, चाकूर, औसा, निलंगा, शिरूर अनंतपाळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. औसा तालुक्यातील फत्तेपूर, किल्लारी, लामजना येथे वीज पडून चार जनावरे दगावली आहेत. त्याचबरोबर ज्वारी, द्राक्षास फटका बसला आहे, तसेच पशुधनासाठीचा कडबा भिजला आहे.

जालना जिल्ह्यातील विविध भागांमध्ये गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. भोकरदन, जाफराबाद, अंबड तालुक्यासह जालना शहरालादेखील अवकाळी पावसाने झोडपून काढले. भोकरदन तालुक्यास बसला आहे. केदारखेडा, आव्हान, सिपोरा बाजार, दानापूर, वडोद तांगडा या गावात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. आव्हाना परिसरात झाड उन्मळून पडल्याने दुचाकीचे नुकसान झाले आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात गुरुवारी दुपारी ४ वाजेनंतर वादळी, वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. तर सिल्लोड तालुक्यातील अनेक गावांमधील शेत शिवारात गारांचा खच पडल्याचे पहावयास मिळाले. या गारपीट व अवकाळी पावसाने उन्हाळी व फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कन्नड तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस