शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

मराठवाड्यात गारपीट; वीज पडून दोन ठार, सहा जनावरांचा मृत्यू, फळबागांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 11:58 AM

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी, वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात अनेक ठिकाणी बुधवारी रात्री आणि गुरुवारी गारपीट झाली. वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. वीज पडून परभणी जिल्ह्यातील दोघांसह सहा जनावरांचा मृत्यू झाला.

गंगाखेड (जि. परभणी) तालुक्यातील इळेगाव येथील शेतशिवारात शेतातील कापूस वेचून घरी निघताना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नरेंद्र धोंडिबा शेळके (६५) या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी मेघगर्जनेसह पाऊस सुरू होता. सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा येथे शेळ्या चरण्यासाठी आलेल्या हरिबाई एकनाथ सुरनर यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. खपाट पिंपरी येथे किशोर खंदारे यांची शेळी व शेळगाव येथे गिरीश हल्गे यांचा बैल वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. परभणी तालुक्यातील साळापुरी गाव शिवारात बुधवारी रात्री आठ वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी दोन ठिकाणी वीज पडून एक गाय व दोन म्हैस दगावले.

बीड जिल्ह्यात विविध भागांत गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. धारूर, वडवणी व गेवराई तालुक्यांत गारा बसरल्या. यामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेवराई तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. धारूर- वडवणी रस्त्यावर पहाडी दहीफळ येथे मोठे झाड पडल्याने वाहतूक काही वेळ बंद होती.

लातूर जिल्ह्यात वीज पडून चार जनावरे दगावलीलातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, औसा तालुक्यातील तीन गावांमध्ये वीज पडून चार जनावरे दगावली. या पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी शहरासह देवणी, चाकूर, औसा, निलंगा, शिरूर अनंतपाळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. औसा तालुक्यातील फत्तेपूर, किल्लारी, लामजना येथे वीज पडून चार जनावरे दगावली आहेत. त्याचबरोबर ज्वारी, द्राक्षास फटका बसला आहे, तसेच पशुधनासाठीचा कडबा भिजला आहे.

जालना जिल्ह्यातील विविध भागांमध्ये गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. भोकरदन, जाफराबाद, अंबड तालुक्यासह जालना शहरालादेखील अवकाळी पावसाने झोडपून काढले. भोकरदन तालुक्यास बसला आहे. केदारखेडा, आव्हान, सिपोरा बाजार, दानापूर, वडोद तांगडा या गावात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. आव्हाना परिसरात झाड उन्मळून पडल्याने दुचाकीचे नुकसान झाले आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात गुरुवारी दुपारी ४ वाजेनंतर वादळी, वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. तर सिल्लोड तालुक्यातील अनेक गावांमधील शेत शिवारात गारांचा खच पडल्याचे पहावयास मिळाले. या गारपीट व अवकाळी पावसाने उन्हाळी व फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कन्नड तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस