शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

सिल्लोड तालुक्यात दुसऱ्या दिवशीही गारपीट; धावत्या दुचाकीवर वीज कोसळून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 7:43 PM

यावेळी झालेल्या गारपीटीमध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सिल्लोड: तालुक्यातील १० गावांत गुरुवारी सायंकाळी व शुक्रवारी दुपारी ४ वाजता असे दोन दिवस वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यावेळी झालेल्या गारपीटीमध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  तर उंडणगाव येथे वीज कोसळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. 

आज दुपारी अंभई, घाटनांद्रा, हट्टी, बहुली, मांडणा, अजिंठा, शिवना, गोळेगाव, राहिमाबाद, आसडी, मंगरुळ, उंडणगाव, केळगाव सर्कल मध्ये वादळी वाऱ्या सहित अवकाळी पाऊस झाला. रहिमाबाद, आसडी, मंगरुळ, डोंगरगाव, मांडणा, हट्टी, बहुली, चांदापुर परिसरात गारपीट झाली. यात सिड्सचा कांदा, मिरचीचे रोप, शिमला मिरची, बाजरी, ज्वारी, मका पिकांचे व फळबागेचे मोठे नुकसान झाले. वाऱ्यामुळे आंब्याच्या कैऱ्या पडल्या.

गारपीटीमुळे चिंचपुर येथील शेतकरी विजय जंजाळ यांच्या मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले. प्रकाश जंजाळ यांच्या कांदा सिड्स पिकाचे नुकसान झाले. तर माधव पाटील जंजाळ यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील टिन पत्रे उडाली त्यावर एक झाड कोसळले त्यात एक मैस जखमी झाली. सोलारच्या प्लेटा फुटल्या.

सलग दोन दिवस  सिल्लोड तालुक्यात झालेल्या अवकाळी व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीचे तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक यांनी तात्काळ पंचनामे करावे असे आदेश सिल्लोडचे तहसीलदार  रुपेश खंदारे यांनी दिले आहेत. गारपीटमुळे तालुक्यातील जवळपास २०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला आहे.

उंडणगाव येथे दुचाकीवर वीज कोसळली सोयगाव येथून शेख जाबेर शेख रउफ ( २२, रा सोयगाव ह. मु. सिल्लोड) हा आईसह दुचाकीवर सिल्लोडकडे येत होते. यावेळी अचानक धावत्या दुचाकीवार वीज कोसळली. यात शेख जाबेर शेख रउफ याचा जागीच मृत्यू झाला. तर हाजराबी उर्फ शबाना शेख रउफ ( ४५ रा.सोयगाव ह मु सिल्लोड) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस