शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

सिल्लोड तालुक्यात दुसऱ्या दिवशीही गारपीट; धावत्या दुचाकीवर वीज कोसळून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 19:44 IST

यावेळी झालेल्या गारपीटीमध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सिल्लोड: तालुक्यातील १० गावांत गुरुवारी सायंकाळी व शुक्रवारी दुपारी ४ वाजता असे दोन दिवस वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यावेळी झालेल्या गारपीटीमध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  तर उंडणगाव येथे वीज कोसळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. 

आज दुपारी अंभई, घाटनांद्रा, हट्टी, बहुली, मांडणा, अजिंठा, शिवना, गोळेगाव, राहिमाबाद, आसडी, मंगरुळ, उंडणगाव, केळगाव सर्कल मध्ये वादळी वाऱ्या सहित अवकाळी पाऊस झाला. रहिमाबाद, आसडी, मंगरुळ, डोंगरगाव, मांडणा, हट्टी, बहुली, चांदापुर परिसरात गारपीट झाली. यात सिड्सचा कांदा, मिरचीचे रोप, शिमला मिरची, बाजरी, ज्वारी, मका पिकांचे व फळबागेचे मोठे नुकसान झाले. वाऱ्यामुळे आंब्याच्या कैऱ्या पडल्या.

गारपीटीमुळे चिंचपुर येथील शेतकरी विजय जंजाळ यांच्या मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले. प्रकाश जंजाळ यांच्या कांदा सिड्स पिकाचे नुकसान झाले. तर माधव पाटील जंजाळ यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील टिन पत्रे उडाली त्यावर एक झाड कोसळले त्यात एक मैस जखमी झाली. सोलारच्या प्लेटा फुटल्या.

सलग दोन दिवस  सिल्लोड तालुक्यात झालेल्या अवकाळी व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीचे तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक यांनी तात्काळ पंचनामे करावे असे आदेश सिल्लोडचे तहसीलदार  रुपेश खंदारे यांनी दिले आहेत. गारपीटमुळे तालुक्यातील जवळपास २०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला आहे.

उंडणगाव येथे दुचाकीवर वीज कोसळली सोयगाव येथून शेख जाबेर शेख रउफ ( २२, रा सोयगाव ह. मु. सिल्लोड) हा आईसह दुचाकीवर सिल्लोडकडे येत होते. यावेळी अचानक धावत्या दुचाकीवार वीज कोसळली. यात शेख जाबेर शेख रउफ याचा जागीच मृत्यू झाला. तर हाजराबी उर्फ शबाना शेख रउफ ( ४५ रा.सोयगाव ह मु सिल्लोड) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस