शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

मराठवाड्यात गारपीट; फळबागा, खरीप पिकांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 12:04 IST

Hailstorm in Marathwada : गारपिटीने शेतकऱ्यांची धांदल उडाली. फळबागा, रब्बी गहू, कांदा व काढणीला आलेल्या कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

औरंगाबाद / जालना/हिंगोली : मराठवाड्याच्या काही भागांत मंगळवारी गारपीट झाली (Hailstorm in Marathwada) . वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने फळबागा व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुन्हा अचानक आलेल्या या आपत्तीमुळे बळीराजाला मोठा फटका बसला आहे (In Marathwada excessive damage to fruit farming and kharif crops due to hailstorm ) . औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, गंगापूर तसेच वैजापूर आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गारपीट झाली. हिंगोलीसह काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली असून, हवेत गारवा निर्माण झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील जामगाव शिवारात ऊस काढणीसाठी कन्नड व तीसगाव येथून आलेल्या नऊ कुटुंबांना अवकाळी गारपिटीचा चांगलाच फटका बसला. पाल उडून गेल्याने या कुटुंबाला गारपिटीचा मार सहन करावा लागला. पालावरील जीवनावश्यक वस्तू व अन्यधान्याची नासाडी झाल्याने ऊसतोड कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच तालुक्यातील वाहेगाव, सिद्धपूर, जामगाव, कायगाव, भेंडाळा, अंमळनेर शिवारात शेतकऱ्यांची धांदल उडाली. रब्बी गहू, कांदा व काढणीला आलेल्या कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा, लोहगाव, बालानगर, जायकवाडी, टाकळी पैठण, पाचोड, कडेठाण, लिंबगाव, ढाकेफळ, अमरापूर वाघुंडी, मुलानी वाडगाव, तोंडोळी, ७४ जळगाव, लामणगाव, ब्रम्हगव्हाण, जोगेश्वरी, खादगाव, विहामांडवा, थेरगाव आदी परिसराला मंगळवारी दुपारी चारनंतर वादळी वारे, गारांसह पडलेल्या पावसाने झोडपून काढले. यासह दावरवाडी, रांजणगाव खुरी, चितेगाव, बिडकीन परिसराला पावसाने झोडपले. कन्नड तालुक्यातील पिशोरमध्येही गारपीट झाली. सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने गहू व इतर रब्बी पिकांचे नुकसान झाले.

जालन्यात वीज कोसळून बैल ठारजालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. खरीप हंगामातील गहू, मका पिके आडवी झाली, तर वालसावंगी येथे वीज कोसळून एक बैल ठार झाला. वालसावंगी, पद्मावती, पारध, अवघडराव सावंगी, सुंदरवाडी, सिपोरा बाजारसह आदी भागांत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला व मोठ-मोठी झाडे उन्मळून पडली.

हिंगोलीत विजांचा कडकडाटहिंगोली जिल्ह्यात सायंकाळी साडेपाच वाजेपासूनच विजांचा कडकडाट सुरू झाला. कळमनुरी, औंढा नागनाथ, डिग्रस कऱ्हाळे, खुडज आदी ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली. येत्या २ ते ८ जानेवारी २०२२ दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविली आहे.

टॅग्स :HailstormगारपीटAurangabadऔरंगाबादHingoliहिंगोलीJalanaजालना