शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

‘हर घर जल’ गावे घोषित, वॉटर ग्रीडच्या कामांमुळे अडले घोडे, ग्रामस्थांचे नळ कोरडेच!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 8:02 PM

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून तब्बल ६६३ कोटी रुपयांच्या निधीतून जलजीवन मिशन अंतर्गत ११४५ योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

छत्रपती संभाजीनगर : जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झालेल्या १८१ गावांतील ७३ हजार २५२ घरांना नळजोडणी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातील ५३८ गावे ‘हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तरीही अनेक गावांत नळाला पाणीच येत नाही, तर काही गावांना प्रति माणसी ५५ लिटर ऐवजी कधी कधी १०-२० लिटर एवढाच पाणीपुरवठा होत असल्याचे वास्तव आहे.

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून तब्बल ६६३ कोटी रुपयांच्या निधीतून जलजीवन मिशन अंतर्गत ११४५ योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. जिल्ह्यातील १२४१ गावांसाठी योजनांची कामे जि.प. पाणीपुरवठा विभाग आणि जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जात आहेत. सुरुवातीला मार्च अखेरपर्यंत हे ‘मिशन’ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे राज्यभरातच मुदतीच्या आत पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. अखेर शासनाने या ‘मिशन’ अंतर्गत रखडलेल्या कामांसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदवाढ दिली. त्यानुसार योजनांच्या कामाने गती घेतली आहे.

सध्या ५७५ गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची ५५६ कामे पूर्ण झाली असून ५३८ गावे ‘हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात आली, तर १५७ गावे प्रमाणित करण्यात आली आहेत. यापैकी १८१ गावांतील ७३ हजार २५२ घरांना नळजोडणी देण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. असे असले तरी नळजोडणी दिलेल्या अनेक गावांतील नळांना घरापर्यंत पाणीच येत नाही. नियमानुसार प्रतिदिन प्रति माणसी ५५ लिटर पाणी देण्याचे ‘जलजीवन मिशन’चे उद्दिष्ट आहे. मात्र, अनेक धरणांनी तळ गाठला आहे, तर वैजापूर, गंगापूर, पैठण, सिल्लोड या चार तालुक्यांसाठी ‘वॉटर ग्रीड’च्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. सध्या वॉटर ग्रीडचे काम प्रगतिपथावर असल्यामुळे अनेक गावांमध्ये प्रतिमाणसी ५५ लिटर पाणी देणे शक्य झालेले नाही, हे वास्तवही समोर आले आहे.

ग्रामसभेने घ्यावा लागतो ठरावजल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे व गावातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी नळजोडणी दिल्यानंतर ‘हर घर जल’ प्रमाणित करण्यात येते. त्यानंतर त्या ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन आपले गाव ‘हर घर जल’ घोषित करावे लागते. त्यानंतर केंद्र सरकारच्या या जल जीवन मिशनच्या पोर्टलवर या गावांची नोंद केली जाते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी