शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

'हवा का काम है चलना, दिये का काम है जलना'; कुलगुरू प्रमोद येवलेंची मुल्यांकन पद्धतीवर टिपणी

By योगेश पायघन | Updated: February 22, 2023 18:26 IST

'विद्यापीठाचे कार्य समित्यांवर आधारित असून कायद्याच्या चौकटीत करावे लागते.'

औरंगाबाद : हवा भी सही भी, दिया भी सही था, हवा का काम है चलना, दिये का काम है जलना.... अशा शब्दात आपल्या येथील मुल्यांकनाची पद्धत असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले म्हणाले. स्वातंत्र्यानंतर आलेले हे तिसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उच्च शिक्षणाला स्वायत्तेकडे घेऊन जाईल. तर कुलगुरू परीषदेतील विचार मंथन त्यात दिशादर्शक ठरेल. असा विश्वास व्यक्त करतांना विद्यापीठाचे कार्य समित्यांवर आधारित असून कायद्याच्या चौकटीत करावे लागते. त्यामुळे इच्छा असूनही विद्यापीठाला न्याय देता येत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

भारतीय विद्यापीठ महासंघाच्या पश्चिम विभागीय परिषदेचा समारोप बुधवारी (दि.२२) झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावतीने ही परिषद घेण्यात आली. महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. जी. डी. शर्मा अध्यक्षस्थानी होते. यावेळी महासचिव डॉ.पंकज मित्तल, यजमान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी डॉ.के.व्ही.काळे, डॉ. विलास सपकाळ यांच्यासह विविध विद्यापीठांचे कुलगुरु, अधिष्ठाता डाॅ. वाल्मिक सरवदे, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.प्रशांत अमृतकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. डॉ.जी.डी.शर्मा यांनी अध्यक्षीय समारोपात परीक्षा व मुल्याकंन पध्दतीबद्दल उहापोह करून विद्यापीठ महासंघ परीक्षा व मुल्यांकना संदर्भात महत्वाची भुमिका निभावेल असे स्पष्ठ केले. प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांनी अहवाल वाचन केले. नोडल ऑफीसर डॉ. मुस्तजिब खान वत्यांच्या टिमने केलेल्या उत्कृष्ठ नियोजनाचे यावेळी कौतुक करण्यात आले. डॉ. सुचेता एम्बल यांनी सूत्रसंचालन तर कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी आभार मानले.

परीक्षा केंद्रीत अध्यापन ‘पॅटर्न’ बदलण्याची गरजसध्याच्या शिक्षण पध्दतीत परीक्षा केंद्रीत’ अध्ययन, अध्यापन असल्यामुळे विद्यार्थ्यांना तणावाला सामोरे जावे लागते. वास्तविक अध्यापनवर आधारित कौशल्ये, परीक्षा हा पॅटर्न राबविल्यास विद्यार्थी हसत-खेळतील शिकतील, असा विश्वास विद्यापीठ महासंघाच्या महासचिव डॉ.पंकज मित्तल यांनी व्यक्त केला. शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांनाही काही प्रमाणात स्वायत्ता मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

जाणीवा आणि उणीवांचे मुल्यांकन व्हावेपरिषदेत सकाळच्या सत्रात नाविण्यपूर्ण मुल्याकंन पध्दती व अध्यापकांचा क्षमता विकास याविषयी चर्चा झाली. विद्यार्थ्यांचे सात्तत्यपूर्ण मुल्याकंन होणे गरजेचे आहे, असा सूर परिसंवादात निघाला. सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.के.व्ही.काळे यांनी विद्यार्थ्यांच्या जाणीवा आणि उणीवांचे मुल्यांकन होणे गरजेचे असल्याचे सांगितले, प्रा.संदीप संचेती, डॉ.व्ही.एन.राजशेखर पिल्ले, डॉ.जी.जी.मिलाणी यांनी मार्गदर्शन केले.

समारोपाकडे कुलगुरूंची पाठकुलगुरू परिषदेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान मधील पहिल्या दिवशी ६० कुलगुरूंची उपस्थिती होती. तर ऑनलाईन ५० हून अधिक कुलगुरूंनी सहभाग नोंदवला. मात्र, समारोपावेळी निम्म्याहून अधिक कुलगुरू शिर्डी, वेरूळ येथे दर्शन पर्यटनाला निघून गेले होते. त्यामुळे मोजक्या कुलगुरूंच्या परिषदेत समारोप पार पडला. यावेळी कुलगुरूंपेक्षा विद्यापीठातील विभागप्रमुखांची संख्या अधिक होती.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद