शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

ज्याला शरीर सांभाळता येईल, त्यालाच देव मिळेल: निवृत्ती महाराज इंदोरीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 17:49 IST

ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर : राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त हरिकीर्तन, हजारोंकडून अभीष्टचिंतन

औरंगाबाद : कोरोनाच्या तीन लाटांतून वाचलो म्हणून आपण खरे भाग्यवान आहोत...अहो, पैसा कामी येत नाही, सत्ता कामी येत नाही... हे कोरोनाने शिकविले.. आता भ्रमात राहू नका...क्वारंटाईन झाल्यावर घरचेही जवळ येत नाहीत... ज्याला शरीराला सांभाळता येईल, त्यालाच देव मिळेल... ८० टक्के लोक हृदयविकाराने मरतात... कारण एकच; तणाव. यासाठी तणावमुक्त जगा, शरीर सांभाळा, असे आवाहन लोकप्रिय कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले आणि उपस्थितांनी यास होकार देत समर्थन केले.

प्रसंग होता लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या ७० व्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सोमवारी रात्री आयोजित हरिकीर्तनाचा... कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची एवढी प्रचंड गर्दी केली होती की, कारगिल मैदान अपुरे पडले. फटाक्यांच्या आतषबाजीत इंदोरीकर महाराजांचे आगमन झाले. यावेळी व्यासपीठावर राजेंद्र दर्डा, लोकमतचे सहव्यवस्थापकीय व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. सहकार मंत्री अतुल सावे यांनीही हजेरी लावली होती. प्रारंभी आयोजक बबन डिडोरे पाटील व विशाल डिडोरे पाटील यांनी इंदोरीकर महाराजांचा सत्कार केला. सायली डिडोरे यांनी महाराजांचे औक्षण केले.

‘रूप पाहता लोचनी’ व ‘ आपुला तो एक देव करूनी घ्यावा’ या दोन अभंगांनी महाराजांनी सुरुवात केली. महाराज म्हणाले की, आज अपघाताने लोक जास्त मरतात. त्याची तीन कारणे आहेत. पहिले म्हणजे दारू पिऊन वाहन चालविणे, दुसरे अतिवेगात चालविणे व तिसरे चालवताना मोबाइलवर बोलणे... मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही दारू सोडा, असे कळकळीचे आवाहन महाराजांनी केले. मोबाइलमुळे काय तोटे होत आहेत, हे महाराजांनी विविध उदाहरणे देत व लहान मुलांना बोलते करत विनोदी ढंगातून मांडले. सोशल मीडियामुळे लोक वेडे झाले आहेत. अनेक गंभीर विषय विनोदी ढंगात सादर करीत सर्वांना आरसा दाखविला. रात्रीचे १० कधी वाजले, हे कोणाला कळलेही नाही. कीर्तन सुरू होण्याआधी ह.भ.प. प्रभाकर महाराज कुंटे यांनी भारूड सादर केले.

शंभर वर्षे जगा- महाराजांचा आशीर्वादइंदोरीकर महाराज यांनी सांगितले की, आज राजेंद्र दर्डा यांचा ७० वा वाढदिवस आहे. मात्र, त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटत नाही की, ते ७० वर्षांचे झाले. (हंशा) त्याचे कारण म्हणजे त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेतली. त्यांच्या प्रेमापायी आयोजक बबनराव डिडोरे २४ वर्षांपासून माझे हरिकीर्तन ठेवत आहेत. दर्डा यांचा १०० वा वाढदिवस आपण साजरा करू, त्यावेळीसही माझेच कीर्तन असेल व आयोजक डिडोरेच असतील; असा आशीर्वाद महाराजांनी देताच उपस्थित हजारो नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत अभीष्टचिंतन केले.

अंगणात तुळस लावा नसता...इंदोरीकर महाराज म्हणाले की, महिलांनी घराच्या अंगणात तुळस लावावी. कारण, तुळसच ऑक्सिजन देते. कोरोना काळात ऑक्सिजन मिळाले नाही म्हणून हजारो लोक मरण पावले. राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक घर एक झाड’ लावण्याचा सर्वांनी संकल्प करावा. सोपान महाराज सानप, माधव महाराज पितरवाड, पोपट महाराज फरकाडे, श्रीकांत शेळके, संतोष साळुंके, काशीनाथ महाराज, अजय डिडोरे, साहेबराव म्हस्के, विजय दिसागज, राजाराम मोरे, दीपक पवार, अशोक बादल, रमेश दिसागज, बाळासाहेब हरबक आदींंनी हा कीर्तन सोहळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

‘बहारो फूल बरसाओ’ आणि वन्समोअरनिवृत्ती देशमुख महाराजांचे कीर्तन म्हणजे समाजातल्या व्यंगांवर बोट ठेवण, त्यावर प्रबोधन करण. हल्ली लग्नामध्ये काही वाईट प्रथा शिरल्या आहेत, यावर सर्वांचे लक्ष वेधले. त्याचे विविध उदाहरण देत असताना, नवरदेव लग्नमंडपात येतो तेव्हा ‘बहारो फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है’ हे गीत म्हटले जाते. ते गीत इंदोरीकर महाराजांनी आपल्या ढंगात गात व त्याच वेळी मद्यपी नवरदेवाची नकल करीत पोट धरून हसविले... या गाण्याला उपस्थितांनी ‘वन्समोअर’ मिळाले...

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRajendra Dardaराजेंद्र दर्डा