शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

जिल्ह्यात उष्णतेची लाट; बालकांना आजार

By admin | Published: April 24, 2016 11:22 PM

हिंगोली : दिवसेंदिवस सूर्य आग ओकू लागला असून जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. परिणामी, लहान बालकांना उन्हामुळे विविध आजार जडत आहेत.

हिंगोली : दिवसेंदिवस सूर्य आग ओकू लागला असून जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. परिणामी, लहान बालकांना उन्हामुळे विविध आजार जडत आहेत. त्यात उष्माघातामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे.हिंगोली जिल्ह्यात तापमान वाढत चालले आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत असून उन्हात घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. तापमान वाढत असल्याने लहान बालकांना विविध आजार जडत आहेत. नेहमी गजबजणाऱ्या ठिकाणी उन्हामुळे शुकशुकाट दिसून येत आहे. लग्नसराई सुरू असल्याने अनेकांना उन्हातच घराबाहेर पडावे लागत असल्याचे चित्र आहे. तापमान वाढत असल्याने झपाट्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे बालकांना ताप, डोके दुखणे, चक्कर येणे यासह विविध आजार जडत असून उपचारासाठी रूगणालयात गर्दी होत आहे. मजुरी करणारे व शेतकऱ्यांनी शक्यतो सकाळी लवकर कामे करावीत व दुपारी आराम करावा. त्यानंतर सायंकाळी सावलीत कामे केल्यास उष्माघातापासून बचाव होऊ शकतो. जिल्हा दुष्काळाच्या संकटात सापडला असून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यात ग्रामीण भागात भर उन्हातच ग्रामस्थांना पाण्याच्या शोधार्थ भटकावे लागत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)