शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

Uddhav Thackeray: मोदी-शहांसह या ९ नेत्यांवर घणाघात, छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची गर्जना

By महेश गलांडे | Updated: April 2, 2023 21:23 IST

उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. माझे पक्ष चोरले, धनुष्यबाण चोरला, बापही चोरायला निघाले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

छत्रपती संभाजीनगर - छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी या वज्रमुठ सभेतून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. केंद्रातील मोदी सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचा आरोप या नेत्यांनी केला. तर, ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून सत्ताकेंद्र काबिज केली जात आहेत, विरोधकांना अडचणीत आणलं जात आहे, असा सूर सर्वांनीच काढला. या सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ९ जणांचा उल्लेख भाषणात केला. 

उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. माझे पक्ष चोरले, धनुष्यबाण चोरला, बापही चोरायला निघाले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तर, गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, मी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटले होते, तर तुम्ही सत्तेसाठी आता मिंध्यांचे काय चाटताय, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सत्ताधारी, भाजप-शिवसेना पक्षातील ९ जणांचा उल्लेख आपल्या भाषणात केला. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांनाही लक्ष्य केलं. नड्डा म्हणाले देशात एकच पक्ष राहिल, पण मी म्हणतो आधी शिवसेनेला संपवून दाखवा, मग बघू. पण, आम्ही भाजपला संपवू, असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी केला. 

उद्धवठ ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरही बोचरी टीका केली. बाप चोरणारी टोळी म्हणत त्यांचा नोमोल्लेख केला. तर, शिंदे गटाचे मालेगावमधील आमदार सुहास कांदे यांचा नावाचा उल्लेख करत एक कांदा ५० खोक्यांना विकला गेल्याची टीका केली. यासह, चंद्रकांत पाटील यांच्याही नावाचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला. चंद्रकांत पाटील यांनी जाहीर सभेत म्हटलं होतं की, आम्ही काळजावर दगड ठेऊन मिंध्यांना मुख्यमंत्री बनवतोय, असे ठाकरेंनी म्हटलं. तसेच, उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरमधील अब्दुल सत्तार, संजय शिरसाट यांच्यावरही निशाणा साधला. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या विधानाचा उल्लेख करत, तर शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा उल्लेख करत नाव न घेता या दोन्ही नेत्यांवर टीका केली. 

त्यासोबतच, मराठवाड्यातील जालन्याचे नेते असलेल्या राष्ट्रवादीच्या राजेश टोपेंचं काम कोरोना काळात उल्लेखनीय राहिल्याचं त्यांनी म्हटलं. तेव्हा आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपेंनी चांगलं काम केलं, पण आत्ताचे आरोग्यमंत्री... असे म्हणत तानाजी सावंत यांचं नाव न घेता, त्यांच्यावरही निशाणा साधला. यावेळीस, उपस्थितांमधून खेकडा... खेकडा... असा प्रतिसाद मिळाला. 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वासह, देशातील लोकशाही, मोदी सरकारची हुकूमशाही, महाविकास आघाडी, शिंदे गट यांसह अनेक मुद्द्यावर भाष्य केले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदे