शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
2
देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा
3
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत
4
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक
5
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
6
५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात
7
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
8
चीनने अरुणाचलप्रदेशवर हल्ला करावा; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारताविरोधात गरळ ओकली
9
Khyati Global Ventures IPO Listing : लिस्ट होताच 'या' शेअरला लोअर सर्किट, गुंतवणूकदारांची निराशा; डोकं धरण्याची आली वेळ 
10
निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतीच्या २८ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
11
Demat Account Rule : तुमच्या डीमॅट खात्याशी निगडित नियम बदलणार, SEBI ची घोषणा; ‘या’ तारखेपासून बदल होणार
12
सूरजसाठी थेट सिनेमा कसा जाहीर केला? केदार शिंदे स्पष्टच म्हणाले- "स्क्रिप्ट आधीच रेडी होती पण..."
13
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
14
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
15
Stock Market Update Today : मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
16
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
17
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
18
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
19
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती

मराठवाड्याला पावसाचा जोरदार तडाखा; साडेतीन लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 8:28 PM

३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांचे नुकसान ; पाच जिल्ह्यांतील पिकांना पावसाचा तडाखा

औरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन ४१ दिवस झाले आहेत. या ४१ दिवसांत मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील सुमारे साडेतीन लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. पेरण्यानंतर बुड धरलेली ही पिके आगामी काळातील पावसात उभी राहतील की नाही, याबाबत शंका आहे. ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यात (८ ते १८ जुलै) जोरदार पावसाने साडेतीन हजारांहून अधिक गावांतील पिकांना पावसाचा फटका बसला आहे. विभागीय प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जालना ५० हेक्टर, परभणी १२०० हेक्टर, हिंगोली १५ हजार ९४४, नांदेड ३ लाख ३० हजार ८७९, तर लातूर जिल्ह्यातील १५ हेक्टरचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष पंचनामे झाल्यानंतर बाधित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

४७६ हेक्टर जमीन गेली वाहूनजालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील ४७६ हेक्टर जमीन अतिपावसामुळे वाहून गेली आहे. फळपिकांचे ५८ हेक्टर, बागायत ५ हजार ४९९ हेक्टर, जिरायत ३ लाख ३२ हजार ५३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जालन्यातील ३७७, परभणीतील १५००, हिंगोलीतील १९ हजार १९७, नांदेडमधील ३ लाख ३० हजार ३५७, तर लातूरमधील १८ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

१० जण गेले पुरात वाहूनमराठवाड्यात ८ जुलैपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे विभागातील काही जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले. ४१ दिवसांतील पावसाळ्यात १० जण पुरात वाहून गेले आहेत. २४ जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. भिंत पडून एकजण दगावला आहे. दुभती जनावरे, पिकांचे नुकसान व मालमत्तांच्या पडझडी झाल्या. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ७७९ कच्ची, तर तीन पक्की घरे पावसाने पडली आहे. २९८ लहान-मोठी दुधाळ जनावरे, तर १२० ओढकाम करणारी जनावरे दगावली आहेत. बीड जिल्ह्यातील एक, तर नांदेडमधील सात पुलांचे पावसामुळे नुकसान झाल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. सात कि.मी.चे रस्ते वाहून गेले आहेत.

ओल्या दुष्काळाची चाहूल : ४०५ मि.मी. पाऊसविभागात आजवर ६७९ मि.मी.च्या तुलनेत ४०५ मि.मी. पाऊस झाला आहे. २४२ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. १६३ मि.मी. पाऊस जास्त झाला आहे. ५९ टक्के पावसाचे प्रमाण असून, उर्वरित ७३ दिवसांच्या पावसाळ्यात ४० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला, तर ओल्या दुष्काळाचा सामना विभागाला करावा लागण्याची शक्यता आहे. आजवर झालेल्या पावसामुळे काही जिल्ह्यांत ओल्या दुष्काळाची चाहूल लागली आहे.

टॅग्स :agricultureशेतीMarathwadaमराठवाडाRainपाऊस