शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

अतिवृष्टीचा तडाखा! मराठवाड्यात पावसाने घेतला ३४ जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 11:48 AM

लहान, मोठी मिळून ३५१ जनावरे गेली वाहून

औरंगाबाद : मराठवाड्यात ८ ते १५ जुलै दरम्यान झालेल्या जोरदार पावसाने ३४ जणांचा बळी घेतला असून, लहान-मोठी मिळून ३५१ जनावरे पुरात वाहून गेली आहेत. मृत व्यक्तींमध्ये वीजपडून २४ जण, तर पुरात वाहून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ८ जुलैपासून मराठवाड्यात सूर्यदर्शन नव्हते. १५ जुलै रोजी दुपारनंतर ढगाळ वातावरणात बदल झाला. सूर्यदर्शन झाल्यामुळे हवेतील गारवा थोड्या प्रमाणात कमी झाला.

विभागातील आठ जिल्ह्यांत २५१ दुधाळ जनावरे दगावली आहेत, तर ओढकाम करणारी १३६ जनावरे दगावली आहेत. २६ मृतांच्या नातेवाइकांना एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे एक कोटी चार लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाने दिला आहे. ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले असून, पंचनाम्यांचे कामही जिल्हाप्रशासन पातळीवर सुरू असल्याची माहिती प्रशासनाने कळविली आहे.

मागील सात दिवसांतील जोरदार पावसाने ३९० गावांना पुराचा वेढा पडला. यात हिंगोलीतील ६२, नांदेडमधील ३१०, बीडमधील १, लातूरमधील ८, उस्मानाबादमधील दोन गावांचा समावेश आहे. या दोन दिवसांत १६० मोठी, तर ३० लहान जनावरे दगावली आहेत, तर ६० हजार हेक्टर खरिपाची पिके पाण्याखाली आहेत. मराठवाड्यात ८ जुलैपासून जोरदार पाऊस सुरू होता. १५ जुलै रोजी पावसाने उघडीप दिली.

जिल्हा--- मृत्यूऔरंगाबाद--९जालना --७परभणी --१नांदेड --१०बीड --२लातूर --४उस्मानाबाद-- १एकूण-- ३४

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू