शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

शिवाजीनगर भुयारी मार्गात उंचीची ‘कोंडी’; मोठ्या वाहनांचा विचारच नाही, कोंडीचा प्रश्न कायम

By संतोष हिरेमठ | Published: January 13, 2024 1:17 PM

भुयारी मार्ग झाल्यानंतरही वाहतूक खोळंबण्याचा प्रश्न कायम राहण्याची भीती

छत्रपती संभाजीनगर : मोठ्या प्रतीक्षेनंतर शिवाजीनगर रेल्वेगेटवर भुयारी मार्गाचे काम सुरू झाले; मात्र या भुयारी मार्गाच्या ‘उंची’चीच कोंडी झाली आहे. भुयारी मार्ग झाल्यानंतर मोठी वाहने भुयारी मार्गातून जाणार नसल्याची स्थिती आहे. त्यातून भविष्यात भुयारी मार्ग अडचणीचाच ठरण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून भुयारी मार्गाची उंची आताच अधिक ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.

शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात झाली. या भुयारी मार्गाच्या कामाला वर्षभराचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्याचे कामही सुरू झाले आहे. सातारा-देवळाई, सिंदोन-भिंदोन, बाळापूरसह लगतच्या भागातील नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे; परंतु हा भुयारी मार्ग केवळ छोट्या वाहनांना नजरेसमोर ठेवूनच तयार केला जात असल्याने भविष्यात तो किती उपयोगी ठरेल? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शिवाजीनगर भुयारी मार्गाची उंची कमी राहिल्यास भविष्यात मोठ्या वाहनांचा भार संग्रामनगर उड्डाणपुलावरच राहील.

किती आहे शिवाजीनगर भुयारी मार्गाची उंची?शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी रेल्वे रुळाखाली वाहनांना ये-जा करण्यासाठी दोन स्वतंत्र बाॅक्स करण्यात येणार आहे. या बाॅक्सची लांबी ५.५० मीटर आणि उंची ३.५० मीटर राहणार आहे, तर संपूर्ण भुयारी मार्ग हा २२.७६ मीटर लांब असणार आहे. ६.४२ कोटी रुपयांच्या खर्चातून हा भुयारी मार्ग होईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

संग्रामनगर भुयारी मार्गाची उंची किती?संग्रामनगर उड्डाणपूल उभारल्यानंतर नागरिकांनी पाठपुरावा करून येथे भुयारी मार्ग करण्यास रेल्वे प्रशासनाला भाग पाडले. या भुयारी मार्गावर लांबी आणि उंची नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार या भुयारी मार्गाची उंची ३.१० मीटर या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे.

उंची वाढविण्याची मागणी करूरेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन वेगवेगळ्या एजन्सींकडून शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. हे काम मुदतीत झाले पाहिजे. भुयारी मार्गातून मोठ्या बस, मोठी वाहने जाणार नाही. मिनी स्कूल बस जातील. भविष्याचा विचार करून भुयारी मार्गाची उंची वाढविण्याची मागणी केली जाईल.- ॲड. शिवराज कडू पाटील, उच्च न्यायालय

मोठी वाहने नाही जाणारशिवाजीनगर भुयारी मार्गातून मोठी वाहने जाणार नाही, असे समजले आहे. शाळेच्या बस, मिनी बस येथून सहजपणे जातील, अशी उंची हवी. त्यासाठी आताच लक्ष दिले पाहिजे. अन्यथा भविष्यात भुयारी मार्ग गैरसोयीचा ठरू शकतो.- बद्रिनाथ थोरात, अध्यक्ष, सातारा-देवळाई जनसेवा कृती समिती

मोठ्या वाहनांचा विचार केला नाहीसंग्रामनगर येथे भुयारी मार्ग करताना मोठ्या वाहनांचा विचार करण्यात आला नाही. येथून केवळ कार जाऊ शकते. शहर बसही जाऊ शकत नाही. भविष्यात वर्दळ वाढली तर मोठी वाहने येथून जाऊ शकणार नाहीत.- श्रीमंत गोर्डे पाटील, अध्यक्ष, मेट्रो औरंगबाद असोसिएशन

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेTrafficवाहतूक कोंडी