शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

हेल्पलाईन १०९८/११२; कृती दलाने वर्षभरात रोखले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७५ बालविवाह

By विजय सरवदे | Published: May 09, 2024 4:51 PM

शासकीय यंत्रणा सतर्क, अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली असून वर्षभरात ७५ बालविवाह रोखण्यात कृती दलाला यश आले आहे. त्यातील तीन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, १० मे रोजी ‘अक्षय तृतीया’ असून हा मुहूर्त साधून बालविवाह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा, तालुका व गावपातळीवरील शासकीय यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. एन. चिमंद्रे यांनी कळविले आहे की, बालविवाह होत असल्याची किंवा तशी तयारी केली जात असल्याचा संशय आल्यास सजग नागरिकांनी यासंबंधीची माहिती शासनापर्यंत पोहोचवावी. संबंधितांचे नावाची गोपनीयता राखली जाईल. जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनाकरीता जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ च्या कायद्याची जाणीव व्हावी, यासाठी तसेच बालवयात कोणताही बालक हक्कांपासून वंचित राहू नये म्हणून सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने कार्यवाही करण्याचे कामकाज सुरू आहे. बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये मुलीचे वय १८ वर्षे, तर मुलाचे वय २१ वर्षांच्या आत असताना विवाह केल्यास तो विवाह बालविवाह म्हणून गणला जातो. त्यासाठी १ लाख रुपये दंड व २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा किंवा दोन्ही, असे शिक्षेचे प्रावधान आहे.

ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारीगावपातळीवर ग्रामसेवक, तर नागरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आपल्या परिसरात वा गावात बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास आपण संबंधितांकडे माहिती देऊ शकता.

हेल्पलाईन १०९८ किंवा ११२जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असतील किंवा होऊ घातले असतील, तर नागरिकांनी चाईल्ड हेल्प लाईन १०९८ किंवा ११२ या क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. बालविवाहाबाबतची माहिती जवळचे पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती, बालकल्याण समिती, जिल्हा बालसंरक्षण कक्ष तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयातही देता येईल.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी