शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
5
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
6
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
7
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
8
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
9
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
10
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
11
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
12
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
13
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
14
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
15
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
16
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
17
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
18
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
19
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
20
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु

अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक ‘बारवे’चे पुनरुज्जीवन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 1:50 PM

शहराजवळील सातारा गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बारवेच्या लोकसहभागातून पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला सातारा ग्रामस्थ आणि जलदूत सामाजिक संस्थेतर्फे रविवारी (दि.६) सुरुवात झाली.

औरंगाबाद : शहराजवळील सातारा गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बारवेच्या लोकसहभागातून पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला सातारा ग्रामस्थ आणि जलदूत सामाजिक संस्थेतर्फे रविवारी (दि.६) सुरुवात झाली. या कामाचा शुभारंभ सेवानिवृत्त प्राचार्य प्रभाकर डोरले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बांधकाम व्यावसायिक प्रमोद खैरनार, जलदूतचे अध्यक्ष किशोर शितोळे उपस्थित होते.

शहराजवळ असलेले ऐतिहासिक सातारा गाव महापालिकेच्या हद्दीत असतानाही पाण्याची कोणतीही व्यवस्था गावात नाही. यामुळे गावकऱ्यांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. या गावातच  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी खंडोबा मंदिर व बारवेचे बांधकाम केले होते. या बारवेला बारमाही पाणी असल्याचे वयोवृद्ध नागरिक सांगतात; मात्र या बारवेला झाडाझुडपांनी वेढले आहे.

 या बारवेत कचरा, माती टाकल्यामुळे जवळपास बुजून गेली होती. बारवेचे दगडी बांधकाम अनेक ठिकाणी बुजून गेले होते, तेव्हा जलदूत या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व पाणीतज्ज्ञ किशोर शितोळे यांनी सातारा गावातील युवकांना एकत्रित करून बारवेचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार केला. यासाठी लोकसहभागातून निधी उभारण्याची मोहीमही सुरू करण्यात आलेली आहे. गावकऱ्यांनी लोकवर्गणी जमा केली. यानुसार रविवारी सकाळी ९ वाजता बारवेच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.

या कामाचा शुभारंभ प्राचार्य प्रभाकर डोरले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जलदूतचे किशोर शितोळे यांनी बारवेच्या पुनरुज्जीवन कामाचा तांत्रिक आराखडा गावकऱ्यांना समजावून सांगितला. यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अश्पाक पटेल, अजय चोपडे, लक्ष्मण सोलाटे, जनकल्याण समितीचे बाळकृष्ण खानविलकर, बाळू मिसाळ, प्रशांत बोठे, सोमीनाथ शिराने, दिलीप आरते, विवेक होणावणे, जलदूतचे प्रताप पाटील, विठ्ठल गायकवाड, चेतन पगारे, ज्ञानेश्वर बोरसे, सविता कुलकर्णी, सुधीर फुलवाडकर, रामेश्वर मोहिते, लक्ष्मण सोलाटे  आदी उपस्थित होते.

बारव ऐतिहासिक ठेवासातारा गावातील ऐतिहासिक बारवेच्या पुनरुज्जीवनाच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. बारवेचे पुनरुज्जीवन झाल्यास सातारावासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. या कामासाठी इतिहासप्रेमी, शहरातील नागरिकांनी पुढे यावे. सदर बारव आपला ऐतिहासिक ठेवा आहे. या कामातून तो जपण्याचाही प्रयत्न करण्यात येत आहे.- किशोर शितोळे, जलदूत सामाजिक संस्था

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसरwater shortageपाणीकपातAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका