शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

एमआयडीसीत गुंडांचा धुडगूस; औरंगाबादच्या उद्योग क्षेत्रात दहशतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 19:42 IST

MIDC Aurangabad : या घटनांमुळे दहशतीखाली आलेले उद्योजक व त्यांच्या संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन, गुंडांना आवरा, अन्यथा उद्योगांना येथून आपले बस्तान हलवावे लागेल, असा इशाराच दिला आहे.

ठळक मुद्देभोगले ऑटोमोटिव्ह प्रकरणात पोलिसांनी तिघांना विविध कलमांखाली अटककामगारांच्या जबाबातून आणखी काही आरोपींची ओळख पटविण्यात आले

औरंगाबाद : रेल्वे स्टेशन औद्योगिक वसाहतीतील भोगले ऑटोमोटिव्हच्या व्यवस्थापकीय संचालकांना दोन दिवसांपूर्वी रविवारी (दि. ८ ऑगस्ट) काही गुंडांनी कंपनीत घुसून मारहाण केली. भोगले ऑटोमोटिव्ह प्रकरणात पोलिसांनी तिघांना विविध कलमांखाली अटक केली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तेथील कामगारांच्या जबाबातून आणखी काही आरोपींची ओळख पटविण्यात आली असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली. (An atmosphere of terror in the industrial sector of Auranabad )

या घटनेस ४८ तासही उलटत नाहीत तोच मंगळवारी (दि. १०) रात्री वाळूज एमआयडीसीतील जोगेश्वरी शिवारातील श्रीगणेश कोटिंग कंपनीचे व्यवस्थापक शिरीषकुमार राजेभोसले (रा. नक्षत्रवाडी) हे कंपनीतून दुचाकीने घरी परतत असताना, १० ते १५ जणांच्या टोळक्याने त्यांना रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. या मारहाणीत राजेभोसले यांचा डावा हात मोडला असून डोळ्याजवळ मोठी जखम झाली. छातीला व शरीराला मुका मार लागला. या कंपनीत कंत्राटी कामगार पुरविण्याचा ठेका देण्याच्या कारणावरून विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या दिल्या जात असल्याचे राजेभोसले यांचे म्हणणे आहे.

एमआयडीसीत गुंडगिरी वाढली; कंत्राट देण्याच्या कारणावरून व्यवस्थापकाला रस्त्यात अडवून मारहाण

या घटनांमुळे दहशतीखाली आलेले उद्योजक व त्यांच्या संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन, गुंडांना आवरा, अन्यथा उद्योगांना येथून आपले बस्तान हलवावे लागेल, असा इशाराच दिला आहे. सीआयआयचे अध्यक्ष रमण अजगावकर, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतेश चटर्जी, मसिआचे उपाध्यक्ष अनिल पाटील, अखिल अब्बास, रवी माछर, मानसिंग पवार, संदेश झांबड आदींची या पत्रकार परिषदेला उपस्थिती होती. शिवाय ज्येष्ठ उद्योजक राम भोगले, सीएमआयएचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू यांनीही या घटनेचा निषेध नोंदविला आहे.

कुणाचीही गुंडगिरी पोलीस खपवून घेणार नाहीतशहराचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सांगितले की, औद्योगिक वसाहतीत घडलेल्या या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भोगले ऑटोमोटिव्ह प्रकरणात अटकेतील तिघांना सहज जामीन मिळणार नाही, अशीही कलमे आहेत. आणखी काही आरोपींची ओळख पटविण्यात आली असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल. शहरात कुणाचीही गुंडगिरी पोलीस खपवून घेणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. तर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही, उद्योग क्षेत्रात गुंडगिरी सहन केली जाणार नाही असे सांगून, जिल्ह्यात उद्योग क्षेत्र वाढत असताना वातावरण खराब करण्याचा काहीजण प्रयत्न करीत आहेत, तो सर्व मोडून काढण्यात येईल, असा इशारा दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaluj MIDCवाळूज एमआयडीसीMIDCएमआयडीसीCrime Newsगुन्हेगारी