शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

तासाभराचा विलंब ठरू शकतो जीवघेणा

By admin | Published: September 23, 2014 11:04 PM

हिंगोली : गतिमान आणि ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे आरोग्याची निष्काळजी हृदयरोगाकडे घेऊन जात आहे.

हिंगोली : गतिमान आणि ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे आरोग्याची निष्काळजी हृदयरोगाकडे घेऊन जात आहे. परिणामी, मागील चार वर्षांत ग्रामीण भागात दुपटीने तर शहरी भागात सहा पटीने रूग्ण वाढले. विशेषत: लक्षणाविना अचानक आणि अनपेक्षितपणे आलेल्या झटक्यानंतरच हा आजार उद्भवल्याचे समजते. तद्नंतर तासाभरात जर रुग्णालय जवळ केले नाही तर प्राणास मुकावे लागते. आरोग्याच्या समस्येविना माणूस सापडणे दुर्मिळच. दिवसेंदिवस नवनवे आजार समोर येताना दिसतात. गंभीर आणि दुर्धर आजारांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली. काही आजार सांगून येतात तर काही आजारांना स्वत:हून आमंत्रण देतो. दोन्हीपेक्षा वेगळा असलेल्या हृदयरोगाचे वैैशिष्ट हे अनपेक्षितपणा आहे; परंतु त्यासाठी मानवाची बदलती जीवनशैैली कारणीभूत ठरते. दिनक्रमातील गतिमानता काहीअंशी या आजाराकडे घेऊन जाते. त्याहीपेक्षा तानतणावाचा परिणाम आजारांना निमंत्रण देणारा ठरतो. तत्क्षणी आरोग्याचा निष्काळजीपणा अधिक भोवण्याची शक्याता असते. प्रामुख्याने हृदयास होणाऱ्या अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे तो उद्भवतो. हृदयातील रक्तवाहिन्यांत चरबीचा साठा होऊन त्याची पोकळी निर्माण होते. परिणामी, रक्तपुरवठा बंद पडल्याने झटका यतो. पुरूषांमध्ये ४५ तर स्त्रियांमध्ये ५५ वर्षांपेक्षा जास्त व्यक्तांनी अधिक धोका संभवतो. आजघडीला या आजारालाही वय राहिले नाही. घरातील व्यक्तींना व जवळच्या नातेवाईकांना जर हृदयरोग असेल तर घरातील कोणालाही हा आजार होऊ शकतो. अचानक छातीत वेदना होतात. तत्क्षणी रूग्णास चालवू नये आणि तातडीने दवाखाना जवळ करावा. हिंगोलीतील सामान्य रूग्णालयात या रूग्णांसाठी कसलीही व्यवस्था नाही. स्वतंत्र विभाग तर लांबचीच बाब आहे. परिणामी, खाजगी रूग्णालयात का होईना तासाच्या आत रूग्णांना घेऊन जाणे अगत्याचे ठरते. अन्यथा अधिक विलंब रूग्णांचे प्राण घेऊ शकतो. हे आहेत उपायहा आजार होऊ नये म्हणून नियमित व्यायाम करावा, रक्ताची तपासणी करावी, चाळीसीनंतर वर्षातून एकदा ईसीजी काढून खात्री करावी. उपचार घेणाऱ्या रूग्णांनी दररोज तासभर चालावे, फास्टफूड, मांस, तेलकट पदार्थ खाऊ नये आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेण्याचा असल्ला डॉ. अगस्ती जवळेकर यांनी दिला. (वार्ताहर)