शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

‘सरकारला अजून किती आत्महत्या हव्यात आहेत ?’

By admin | Published: November 16, 2014 11:10 PM

बीड : संपूर्ण मराठवाड्यात पीक पाण्याची अतिशय वाईट स्थिती आहे. पाणी नाही, पिके गेली आता फक्त शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उरले आहे.

बीड : संपूर्ण मराठवाड्यात पीक पाण्याची अतिशय वाईट स्थिती आहे. पाणी नाही, पिके गेली आता फक्त शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उरले आहे. अशी सारी परिस्थिती असताना भाजपाचे सरकार मात्र दुष्काळ जाहीर करीत नाही. हे सरकार आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट पाहणार आहे? असा सवाल विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे यांनी केला.ते रविवारी जिल्ह्याचा दुष्काळ पाहण्यासाठी आले होते. त्यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुरंदरचे आ. विजय शिवतरे, आ. सदा सरवदे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांची उपस्थिती होती. शिंदे म्हणाले की, बीड जिल्ह्यात सिंचनाचा मोठ्याप्रमाणात अभाव आहे. सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्याला शासनाकडून तात्काळ मदत झाली पाहिजे. मदतीच्या दुष्टीकोनातून राज्य सरकार कुठलीच पावले उचलत नसल्याचे पहावयास मिळत आहे. शासनाने अद्याप पर्यंत जनावरांच्या चाऱ्याची देखील व्यवस्था केलेली नाही. दोन दिवसापुर्वी शासनाने आणेवारी काढली. ही आणेवारी बोगस आहे. ब्रिटीश कालीन पध्दतीने ही आनेवारी काढली जात आहे. आणेवारी काढण्याची पध्दत बदलून नवीन पध्दत लागू करावी, अशी मागणी करत शिंदे पुढे म्हणाले की, मी बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या, येथील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. शासन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी असते. मात्र हे सरकार दुष्काळ निवारणासाठी कुठलेच ठोस पावले उचलत नाही असा आरोप शिंदे यांनी केला. यावेळी शिवसेनेचे बाळासाहेब अंबूरे, सचिन मुळूक, पं. स. सदस्य विलास महाराज शिंदे, पंकज कुटे, विपुल पिंगळे, सुशील पिंगळे आदींची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)