शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

पाणीपुरवठा योजनेतील २७० कोटींचे ‘विघ्न’ कसे दूर करायचे? मनपासमोर प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 4:43 PM

अगोदर मनपाचा वाटाही राज्य शासन देईल, असे सांगण्यात आले होते. नंतर राज्य शासनाने हात वर केले.

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेत राज्य शासनाने महापालिकेवर टाकलेला आर्थिक भार प्रशासनासाठी असह्य ठरत आहे. योजनेत मनपाला ८२२ कोटी रुपयांचा वाटा टाकणे बंधनकारक आहे. राज्य शासनाने ५२२ कोटींचे सॉफ्ट लोन घेण्यास मंजुरी दिली. उर्वरित २७० कोटींचे विघ्न कसे दूर करायचे? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मनपाचा वाटा उशिराने दिल्यास योजनेच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

नवीन पाणीपुरवठा योजना १८४० कोटींवरून २७४० कोटींपर्यंत पोहोचली. अचानक खर्च वाढल्याने शहरातील राजकीय मंडळींनी योजनेचा समावेश केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये करण्याचा निर्णय घेतला. केंद्रानेही त्याला मंजुरी दिली. एकूण योजनेत केंद्र शासनाने २५ टक्के म्हणजेच ६८५ कोटी, ४५ टक्के राज्य शासन ही रक्कम १२३३ कोटी रुपये होते. ३० टक्के मनपाचा वाटा ८२२ कोटी रुपये होतोय. अगोदर मनपाचा वाटाही राज्य शासन देईल, असे सांगण्यात आले होते. नंतर राज्य शासनाने हात वर केले. मनपाने वारंवार अनुदान द्यावे, अशी मागणी केली. खंडपीठानेही अनुदान देण्याचे राज्य शासनाने आदेश दिले. त्यानंतरही शासनाने मनपाला ८२२ कोटींसाठी सॉफ्ट लोनसाठी मंजुरी दिली. मागील महिन्यातच शासनाने यासंदर्भातील जीआर सुद्धा काढला. ८२२ कोटींच्या तुलनेत ७५ टक्के रक्कम महापालिकेला सॉफ्ट लोन म्हणून दिली जाईल, असे त्यात नमूद केले आहे. उर्वरित २५ टक्के रक्कम म्हणजे सुमारे २७० कोटी पालिकेला स्वनिधीतून द्यावे लागतील. एवढी मोठी रक्कम आणायची कोठून हा मनपासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे.

सध्या पगाराचे वांदेदरमहा अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी मनपाकडे पैसे नसतात. सध्या बँक ओव्हर ड्राफ्टच्या माध्यमाने १ तारखेला पगार करीत आहे. जीएसटीचे पैसे शानाकडून आल्यावर बँकेला पगाराचे पैसे देण्यात येतात.

अत्यावश्यक खर्चदरमहा अत्यावश्यक खर्च म्हणजे पाणीपुरवठ्याचे वीज बिल, पथदिव्यांचे बिल, डिझेल, कचरा संकलन, प्रक्रिया आदींसाठी ४५ कोटी रुपये लागतात. दरमहा एवढी रक्कम तिजोरीत जमा सुद्धा होत नाही. अशा परिस्थतीत २७० कोटी रुपये कोठून द्यायचे हा प्रश्न आहे.

पत्राची वाट पाहतोयशासनाने ८२२ कोटींच्या लोनसाठी जीआर काढला. मनपाला अद्याप पत्र मिळाले नाही. पत्र प्राप्त झाल्यानंतरच पुढे काय करायचे हे ठरेल.- संतोष वाहुळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका