शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

दुरूनच दुर्गंधी येणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यावर शेकडो एकरवर फळबाग, ऊस आणि गुरांसाठी गवत

By बापू सोळुंके | Published: May 30, 2024 6:41 PM

दुरूनच दुर्गंधी येणाऱ्या या पाण्यात विद्युत मोटारपंपाद्वारे पाण्याचा उपसा करून फळबाग, ऊस आणि गुरांसाठी गवत पिकविले जात आहे.

छत्रपती संभाजीनगर : पाणीटंचाईमुळे सारे त्रस्त असताना शहरातून वाहणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यावर मात्र वाळूज परिसरातील शेती चांगलीच बहरल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून मंगळवारी दिसून आले.

दुरूनच दुर्गंधी येणाऱ्या या पाण्यात विद्युत मोटारपंपाद्वारे पाण्याचा उपसा करून फळबाग, ऊस आणि गुरांसाठी गवत पिकविले जात आहे. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत आटले आहेत. तीव्र पाणीटंचाईचा सामना सुरू असताना शहरालगतच्या काही गावांत मात्र ड्रेनेजच्या पाण्यावर जोरदार शेती सुरू असल्याचे मंगळवारी लोकमत प्रतिनिधींना दिसून आले. छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वांत मोठ्या नाल्यातून ड्रेनेजचे पाणी वाहत वाळूज, वळदगाव मार्गे पुढे वाहत जाते. या नाल्यातून वाहणाऱ्या घाणेरड्या पाण्याची दुर्गंधी सुमारे अर्धा किलोमीटर परिसरात पसरलेली असते. अशा नाल्याच्या दोन्ही काठावर शेती असलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी नाल्यामध्ये शेकडो विद्युत मोटार पंप टाकले आहेत. 

या पंपाद्वारे नाल्यातील पाणी उपसा करून ते शेतातील पिकांना देण्यात येते. विशेष म्हणजे हा नाला रात्रंदिवस वाहतो. यामुळे पाण्याचा तुटवडा कधीही भासत नाही. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जास्त पाणी लागणाऱ्या उसाची शेती या पाण्यावर सुरू केली आहे. वळदगाव, धामोरी वाळूज परिसरातील नाल्याकाठचे शेतकरी नाल्याच्या पाण्यावर शेती करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागा लावल्या आहेत, तर काही जण भाजीपाला पिकवितात. शिवाय जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून गवत शेतीही मुबलक प्रमाणात दिसून आली. हे गवत शहरातील पशुखाद्य म्हणून विकून बक्कळ कमाई हे शेतकरी करतात.

सुखना नदीतील चेम्बरमध्ये विद्युत मोटारपंपशहराच्या पूर्वेला वाहणाऱ्या सुखना नदीत खूप मोठी ड्रेनेजलाइन आहे. बंद ड्रेनेजलाइनच्या पाइपमध्ये चोकअप हाेऊ नये, तसेच नवीन जोडणी देण्यासाठी ठिकठिकाणी महाकाय चेम्बर आहेत. या चेम्बर्समध्ये सुखनाकाठच्या शेतकऱ्यांनी मोटारपंप टाकून चेम्बरमधील घाणरेड्या पाण्याचा उपसा करून शेतासाठी वापर केला जात आहे.

पाच वर्षांपूर्वी झाली होती मोठी दुर्घटनाचेम्बरमधील मोटार पंप काढताना चार शेतमजूर आणि शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना चार वर्षांपूर्वी घडली. तेव्हा ड्रेनेज चेम्बरमध्ये मोटार पंप बंद करण्याचे निर्देश पोलिस विभागाने शेतकऱ्यांना दिले होते. या घटनेनंतर काही महिने मोटार पंप बंद करण्यात आले होते. मात्र, दरवर्षी उन्हाळ्यात हमखास ड्रेनेजमध्ये मोटारपंप टाकून उपसा करण्याचे काम शेतकरी करतात. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र