शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

चौकाची रचना बिघडल्यामुळे स्टेशन चौकात वाहतुकीचा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 19:19 IST

हजारो प्रवासी, पर्यटकांची आणि वाहनांची वर्दळ असलेल्या रेल्वेस्टेशन चौकात सध्या दररोज वाहतुकीचा बोजवारा उडतो आहे.

औरंगाबाद : हजारो प्रवासी, पर्यटकांची आणि वाहनांची वर्दळ असलेल्या रेल्वेस्टेशन चौकात सध्या दररोज वाहतुकीचा बोजवारा उडतो आहे. एकीकडे चौकाची रचनाच बिघडून गेली आहे, तर दुसरीकडे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी वाहतूक पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त होत आहेत. 

औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरून दररोज २४ रेल्वेंची ये-जा होते. त्यामुळे हजारो प्रवासी, पर्यटकांची ये-जा होते. रेल्वेस्टेशनमध्ये ये-जा करण्यासाठी वेगवेगळे दोन स्वतंत्र दरवाजे आहेत. रेल्वेस्टेशनमधून बाहेर पडण्याच्या गेटसमोर हा चौक आहे. हा गेट वनवे असून तेथून रेल्वेस्टेशनमध्ये वाहने नेण्यास बंदी आहे.

छावणी, मध्यवर्ती बसस्थानक, पैठण रोडकडून येणाऱ्या वाहनांना साधारणत: ५० मीटरचा वळसा घालून रेल्वेस्टेशनमध्ये जावे लागते. हे अंतर टाळण्यासाठी वाहनचालक थेट चौकातील (नो एंट्री) मार्गातून रेल्वेस्टेशनमध्ये घुसतात. त्यामुळे रेल्वेस्टेशनमधून बाहेर पडणारी आणि आतमध्ये जाणारी वाहने समोरासमोर येतात आणि वाहतूक जाम होते.

कोकणवाडी रस्त्याकडून पैठण रोडकडे जाणारे अनेक वाहनचालक चौकात वाहतूक सिग्नल लागलेले असतानाही वाहन पुढे नेतात, तर पैठण रोडकडून येणारे आणि रेल्वेस्टेशनमध्ये जाणारे वाहनचालकही नियमांचे उल्लंघन करून प्रवेश करतात. यातूनही कोंडीत भर पडते. चौकातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी याठिकाणी वाहतूक पोलीस असतात; परंतु ते केवळ बघ्याचीच भूमिका घेतात. सिग्नल तोडणारे, बाहेर पडणाऱ्या मार्गातून रेल्वेस्टेशनमध्ये प्रवेश करणारे आणि रस्त्यावरच रिक्षा उभ्या करणाऱ्यांवर कारवाई होत नाही.

पर्यटकांना बेशिस्त वाहतुकीचे दर्शनचौकाच्या या अवस्थेमुळे रेल्वेस्टेशनमधून बाहेर पडणारे, पर्यटक आणि प्रवाशांना बेशिस्त वाहतुकीचे दर्शन प्रारंभीच घडते. त्याविषयी अनेक जण नाराजी व्यक्त करतात; परंतु वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसAurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन