शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

हुश्श... पाचव्या दिवशी जलवाहिनी सुरू; शहराच्या पाण्यात २० एमएलडी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 18:21 IST

काही दिवसात पाणीपुरवठ्याची परिस्थिती पूर्वपदावर येईल: मनपा

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे टाकण्यात आलेल्या नवीन ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचा जोड निखळल्याने शनिवारपासून ती बंद होती. बुधवारी सकाळी ६ वाजता जलवाहिनी सुरू केली. नक्षत्रवाडी येथे ११:२५ वाजता पाणी आले. जलवाहिनी सुरू झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात २० एमएलडीने वाढ झाली. पुढील काही दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास मनपा पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केला.

शनिवारी सकाळी ९ वाजता ढोरकीन येथे जलवाहिनीचे जॉईंट निखळले. ते दुरुस्त करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कंत्राटदाराने तब्बल चार दिवस लावले. बुधवारी सकाळी ६ वाजता जायकवाडी येथून जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात पाणी येण्यासाठी तीन तास लागले. त्यानंतर पाण्यावर प्रक्रिया करून दोन तासांत नक्षत्रवाडी येथील डोंगरावरील एमबीआरमध्ये पाणी घेण्यात आले. तेथून पाणी सिडको-हडकोसह शहराला देण्यात आले.

याबाबत मनपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी सांगितले की, जलवाहिनीची दुरुस्ती केल्यानंतर बुधवारी सकाळी पाणी उपसा सुरू करण्यात आला. सकाळी ११:२५ वाजता नक्षत्रवाडीत पाणी आले. काही दिवसात पाणीपुरवठ्याची परिस्थिती पूर्वपदावर येईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका