शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले, तर देशाचे ऐक्य धोक्यात येईल : भालचंद्र मुणगेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 14:14 IST

या देशातल्या गरिबांचाही न्यायालयावर विश्वास आहे. तो ज्या दिवशी उडेल, तेव्हा अराजकता माजेल,

ठळक मुद्देअकराव्या पंचवार्षिक योजनेत काँग्रेसने माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि अन्नसुरक्षेचा अधिकार दिला.लोकांपर्यंत घेऊन जाण्यात काँग्रेस अपयशी ठरली. ही पोकळी मोदींनी भरून काढली आणि फायदा करून घेत सत्ता मिळवली.

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले, तर देशाचे ऐक्य, प्रगती, सलोखा आणि स्वातंत्र्य धोक्यात येईल, अशी भीती अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. तसेच कम्युनिस्टांना मोडीत काढायचे या एकाच हेतूने त्यांनी बंगालमध्ये ठाण मांडले. कोरोना संसर्गाच्या काळातही जाहीर सभा घेणे आणि कुंभमेळा भरवण्यास परवानगी देणे, ही घोडचूक असल्याचे ते म्हणाले.

लोकसंवाद प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी डॉ. मुणगेकर यांचे ‘वर्तमानातील राजकारण’ या विषयावर व्याख्यानाचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. या संवादमालेच्या सुरुवातीला काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व्याख्यानाची सुरुवात करताना डॉ. मुणगेकर म्हणाले, अकराव्या पंचवार्षिक योजनेत काँग्रेसने माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि अन्नसुरक्षेचा अधिकार दिला. मात्र, हे लोकांपर्यंत घेऊन जाण्यात काँग्रेस अपयशी ठरली. ही पोकळी मोदींनी भरून काढली आणि फायदा करून घेत सत्ता मिळवली. कोरोनाबाबत राहुल गांधींनी फेब्रुवारीमध्येच इशारा दिला होता; पण मोदींनी तेव्हा हा सल्ला ऐकला नाही. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सूचना केल्या. त्या पत्राला उत्तर देण्याचं सौजन्यही मोदींनी दाखवलं नाही. उलट केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी त्यांची खिल्ली उडवली. कोरोनाची साथ ज्या पद्धतीने हाताळली जात आहे, ती पद्धत अतिशय भयंकर आहे, अशी टीकाही डॉ. मुणगेकर यांनी केली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही सरकारवर हलगर्जीपणाचा आरोप केल्याचा हवालाही त्यांनी दिला. 

तेव्हा अराजकता माजेलतर न्यायव्यवस्था कोसळली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊन न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचे सांगतात. या देशातल्या गरिबांचाही न्यायालयावर विश्वास आहे. तो ज्या दिवशी उडेल, तेव्हा अराजकता माजेल, अशी भीती डॉ. मुणगेकर यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकसंवादचे अध्यक्ष डाॅ. राजेश करपे यांनी केले. डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संकेत कुलकर्णी यांनी केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBhalchandra Mungekarभालचंद्र मुणगेकरcorona virusकोरोना वायरस बातम्या